पवित्र रमजान महिन्यास सुरुवात; पण असं करावं लागेल अमंल … संचारबंदीत अशा आहेत मार्गदर्शक सुचना.

मुंबई दि.14 एप्रिल- आज पवित्र रमजान महिन्याचा (holy month of Ramadan) पहिला दिवस. राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारपासून राज्यात संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. कोरोना संकटामुळे सर्व सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत किंबहुना शासनाचेच तसे आदेश आहेत. त्यामुळे रमजानसाठी देखील सरकारकडून मार्गदर्शक सुचना (Guidelines) जारी करण्यात आल्या आहेत.
(The beginning of the holy month of Ramadan; But it has to be done like this … There are guidelines in the curfew.)
गतवर्षी कडेकोट लॉकडाऊन काळात आलेला पवित्र रमजान महिना (holy month of Ramadan) व ईद अगदी घरातच साजरी करण्यात आली होती. अगदी तशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात उद्भवली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये, अशा सुचना दिल्या गेल्या आहेत.
रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये, आपापल्या घरातच दुवा पठण करावे असेही मार्गदर्शक सुचनांत सांगितले आहे.
सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सींग नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा मार्गदर्शक सुचना (Guidelines) सरकारने दिल्या आहेत. रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ व इतर अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशा सुचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
शिवाय आदेशात धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ता, राजकीय नेते व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साध्यापणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्याची सुचना मांडली आहे. सोशल डिस्टंन्सींग, हॕन्ड सॕनिटायझरचा वापरावर भर देण्याची सुचनाही करण्यात आली आहे. तर वेळोवेळी बदलणाऱ्या नियमानुसार आदेशात बदल होणार असल्याचे आदेशात नमुद आहे. दि.14 बुधवार रात्री 8 पासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी (Curfew) राहणारआहे.