धारुर आगारातील १३ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन;

किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर) येथील आगारातील १३ वाहक व चालकांनी मुंबई येथे कामावर रुजू होण्यास नकार दिल्याने आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई आगार प्रमुख शंकर स्वामी यांनी केली. येथील २४ कर्मचारी मुंबईत काम करुन आल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती म्हणून कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण आहे. याबाबत बोलताना स्वामी यांनी एसटी महामंडळाच्या आदेशाच्या अधिन राहुन दिलेली कामगिरी करण्यास नकार देवून कर्तव्यात कसुर केल्यामुळे कारवाई केली असून कर्तव्यावर रुजू होण्यास तयार असल्याचे लेखी दिल्यास निलंबन मागे घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान या घटनेमुळे कर्मचारी संघटना आक्रमक होत असून आजारी कर्मचारी व वयस्क कर्मचाऱ्यांची मुंबई कामात सुट देवून निलंबन मागे घ्यावे अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!