वक्फ बोर्डाच्या जमिन गैरव्यवहाराप्रकरणी ईडीचे छापे; खरेदीखत येणार अंगलट.

औरंगाबाद दि.11 नोव्हेंबर – औरंगाबाद (Aurangabad)  शहरात आज बड्या उद्योजकांविरोधात ईडीने (ED Raids) छापे टाकले आहेत. वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई, पुणे, औरंगाबादसह सात ठिकाणी ईडीने या धाडी टाकल्या असल्याची माहिती समोर येत आहे. वक्फ जमिनी रजिस्ट्री, खरेदीखत करून विकणे अनेकांच्या अंगलट येणार असल्याचे या कारवाईवरुन दिसून येत आहे.

(ED raids in Waqf Board land misappropriation case; Anglat will come to buy.)

वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई, पुणे, औरंगाबादसह सात ठिकाणी ईडीने (ED) या धाडी टाकल्या आहेत. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ बोर्ड (Waqf Board) हा विभाग सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अखत्यारीत येतो. वक्फ बोर्डाच्या जमिनी भाडेतत्त्वावर देता येतात मात्र त्याची विक्री करता येत नाही. मात्र महाराष्ट्रात वक्फ जमिनीची खरेदीविक्री झाल्याचे प्रकरणं मोठ्या प्रमाणात असून यातून कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत.

अनेक शहरात तर चक्क निवासी वस्त्या वक्फ जमिनीत अशा खरेदी विक्रीच्या गैर व्यवहारातून उभ्या राहिल्या आहेत. याबाबत राज्यभरातून मोठ्या तक्रारी प्राप्त होत असून यातील मोठ्या मांशापासून कारवाईला सुरुवात झाली असल्याचे दिसत आहे. वक्फ जमिनीबाबत अलिकडच्या काळात केंद्र शासनानेही कठोर भुमिका स्विकारली असून काही वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानेही वक्फ कायद्यात बदल करत असे व्यवहार रद्द करण्याचा अध्यादेश काढला आहे.

औरंगाबादमधील काही उद्योगपतींनी वक्फच्या अशा इमारती भाडेतत्त्वार घेऊन त्यावर टोलेजंग इमारतीही बांधल्या आहेत. त्या इमारतीतील गाळे थेट रजिस्ट्री, खरेदीखत करून विकल्यादेखील आहेत. हा गैर व्यवहार शेकडो कोटींचा झाला होता. यासंदर्भातील तक्रारी ईडीकडे दाखल झाल्या होत्या. याविरोधात ईडीने तपाससत्र सुरु होतं. ईडीच्या 54 अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले असून व्यावसायिक आणि उद्योजकांची घरे व आस्थापनांवर छापे टाकले जात आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादचे बडे व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्यावर ईडीची रेड पडल्याचा खुलासा झाला आहे. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) प्रकरणाचा तपास मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांच्याकडे आल्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा जोर धरत आहे. एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास करणारे मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Co-Commissioner of Police Vishwas Nangre Patil) यांचे पद्माकर मुळे हे सासरे आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!