किल्ल्यातील ढासळलेल्या भिंती नव्याने बांधण्यास सुरुवात…

किल्लेधारूरः दि.६(वार्ताहर) येथील ऐतिहासिक किल्ल्यातील Fort Dharur नव्याने बांधलेल्या तीन भिंती ढासळल्या होत्या. या ढासळलेल्या भिंती पुन्हा उभारण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा भिंती ढासळू नयेत व दर्जेदार काम करण्यासाठी इतिहासप्रेमी नागरिक प्रयत्न करत आहेत. आज कायाकल्प प्रतिष्ठाणचे प्रा.विजय शिनगारे Vijay Shingare यांनी प्रत्यक्षात कामावर भेट दिली असून दर्जाबाबत काळजी घ्यावी अशी सुचना केली.
धारूर Fort Dharur येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या डागडुजीसाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सदरील डागडूजीचे काम हे पुरातत्व विभागाने गायत्री कंन्स्ट्रक्शन औरंगाबाद या कंत्राटदाराकडून केले होते. काम केल्यानंतर पाच वर्ष देखभाल व दुरुस्तीची जिम्मेदारी ही गुत्तेदाराची होती. परंतु पाच वर्षे पुर्ण होण्या अगोदरच भिंती ढासळल्या. सदरील प्रकरणी आ. प्रकाशदादा सोळंके Prakash Solanke यांच्या पासुन थेट सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख Amit Deshmukh यांच्या पर्यंत तक्रारी करण्यात आल्या. गड किल्ले Fort संवर्धन समितीचे सदस्य संकेत कुलकर्णी यांनीही या प्रकरणात जातीने लक्ष घालून कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला. यामुळे नव्याने होत असलेले काम दर्जेदार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात कामावर कारागीर पुन्हा छतावरील जून्या भेगा भरण्यात व भिंतीत माती भरण्यात व्यस्त असल्याचे काही पोस्ट वायरल झाल्यामुळे कायाकल्प प्रतिष्ठाणचे प्रा. विजय शिनगारे Vijay Shingare यांनी प्रत्यक्ष कामावर भेट दिली. यावेळी कामावर उपस्थित अभियंता नितिन चारुडे यांची भेट घेवून कामाच्या दर्जावर विशेष लक्ष देण्याची विनंती केली.