राज्याची स्थिती दिलासादायक…. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

मुंबईः दि.२३- गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पण राज्यातील जनतेला दिलासा देणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी काल समोर आली आहे. सोमवारी कोरोनाबाधितांच्या (Corona Positive) संख्येत किंचीत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार २१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख ६ हजार ९४ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ८०६ जणांचा मृत्यू झाला आहे.
The condition of the state is comforting …. Response to the call of Chief Minister Uddhav Thackeray)
सोमवारी दिवसभरात राज्यात ५ हजार ३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ९९ हजार ९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.४६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५७ लाख ९३ हजार ४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ६ हजार ९४ (१३.३४ टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २४ हजार ५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या ५३ हजार ११३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद
रविवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांनी लाईव्ह येऊन कोरोना संदर्भातील नियम पाळण्याचे आवाहन जनतेला केले होते. यानंतर राज्यभरात प्रशासनाने कठोर भुमिका घेत दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवायांना सुरुवात केली. अनेक जिल्ह्यात लग्न समारंभासह इतर कार्यक्रमावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यानंतर मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यात मास्क वापरण्यास सुरुवात झाली. राज्यातील प्रमुख राजकीय व्यक्तीनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांनी लॉकडाऊन साठी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरोना बाधितांच्या संख्येत सतराशे पेक्षा जास्त संख्येने घट झाली आहे. हि घट झाली असली तरी पुढील काही दिवस आणखी सतर्कता बाळगून कोविड नियम सक्तीने पाळावी लागणार आहेत.