तपासणीसाठी आलेल्या महिलेचा धारुरात मृत्यू; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी लागले तब्बल 17 तास.

किल्लेधारूर दि.5 मे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशात थैमान घातले आहे. त्यातच अनेक रुग्णांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या महिला रुग्णावर वेळीच उपचार न झाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. कोरोना संशयित (Corona suspect) असल्याने त्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, असा कुटूंबियांसमोर प्रश्न उपस्थित झाला. याबाबत प्रशासनाला माहिती देवुनही सोमवारी मध्यरात्रीपर्यंत पेच सुटला नव्हता. अखेर दुसऱ्या दिवशी मृतदेहावर प्रशासनाकडून कोविड नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले.
(The death of a woman who came for investigation; It took 17 hours to dispose of the bodies.)
मिळालेल्या माहितीनूसार धारुर शहरातील अंदाजे 45 ते 50 वर्षांच्या महिला त्रास होत असल्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेली. यावेळी सदरील महिलेची अॉक्सिजन लेवल कमी असून कोरोना लक्षणे (Corona suspect) असल्यामुळे कोविड सेंटरला तपासणीसाठी (Corona Test) पाठवण्यात आले. या रुग्णाला पुढील उपचाराची गरज असल्याचे सांगत कोविड सेंटरमध्ये कोरोना तपासणी (Corona Test) शिवाय अंबाजोगाई येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला.
मात्र महिलेसोबत कोणीही नसल्याने थेट घरी नेण्यात आले. घरी आल्यावर अवघ्या तासाभरात महिलेचा मृत्यू झाला. कोरोनाची लक्षणे असल्यामुळे कुटूंबियांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नगर पालिकेस तर पालिकेने आरोग्य विभागाकडे सदरील विषय नेला. यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. सोमवारी सांयकाळी 5 च्या सुमारास घडलेल्या या मृतदेहाला प्रशासनाने मध्यरात्री नंतर ताब्यात घेतले.
त्यानंतर मृतदेहावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र प्रशासनाच्या टोलवाटोलवीमुळे कुटूंबियांना नाहक त्रास सहन करावा लागला. कुटूंबियांनी प्रशासनाला माहिती देऊनही मृतदेह नेण्यास प्रशासन पुढे आले नाही. त्यानंतर तब्बल सतरा तासांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात पत्रकार हरिभाऊ मोरे यांनी मध्यस्थी केल्यामुळे अखेर सदरील महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या येथील आरोग्य, पालिका, महसुल व पोलिस प्रशासनात अवमेळ असल्याचे दिसत आहे.
मराठवाड्यात सरासरी 125 ते 130 मृत्यू दररोज होत आहेत. आतापर्यंत 9 हजार 557 जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. औरंगाबाद शहरात मंगळवारी घाटी रुग्णालयात 40 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संसर्ग वाढला आहे. अंगावर दुखणे काढल्यामुळे शेवटच्या क्षणी रुग्ण डॉक्टरांकडे येत आहेत. परिणामी उपचारासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तर अनेक रुग्ण घरीच उपचार करुन मृत्यूच्या दाढेत जात आहेत. कोरोना लक्षणे असताना तपासणी न करता उपचार करणाऱ्यांचा मृताचा (Corona Death) आकडा मोठा आहे.