लॉकडाऊनचा पहिला दिवस विरोधाना गाजला; कडकडीत बंद… टप्प्या टप्प्याने शिथिलता देण्याचे आश्वासन

बीड दि.26 मार्च- बीड लॉकडाऊनचा (Beed Lockdown) पहिला दिवस विरोधाने गाजला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोघांनी लॉकडाऊनला (Beed Lockdown) विरोध करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आष्टी शहरात आ.सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी रस्त्यावर येत सर्व व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. तर बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर (Dr.Bharatbhushan Kshirsagar) यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांची भेट घेवून लॉकडाऊनचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. दरम्यान जिल्हाभर आज लॉकडाऊनचा पहिल्या दिवसात कडकडीत बंद दिसुन आला.
(The first day of the lockdown sparked protests; Strictly closed … promise to relax in stages)
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग कमी करुन साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला. आज दि.26 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र लॉकडाऊनच्या घोषणेनंतर याचा तीव्र विरोध व्यापाऱ्यांसह विविध पक्ष संघटनांनी सुरु केला. गतकाळातील टाळेबंदीमुळे आणखी जनजीवन सुरळीत न झाल्यामुळे लॉकडाऊन काळातील शिथिलता वेळेत बदल करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली.
आज पहिल्या दिवशीच आ.सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी कायदेभंग केला. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी आ.धस यांना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांच्या बरोबर चर्चा करुन 29 मार्चनंतर शिथिलता देण्याचा विचार करण्याचे लेखी आश्वासनानंतर बंद पाळण्यात आला. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन युवकांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोघांना ताब्यात घेतले. अॉल इंडिया पँथर सेनेचे ॲड.धम्मानंद वाघमारे व नितिन सोणवने अशी या कार्यकर्त्यांची नावे आहेत.
बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर (Dr.Bharatbhushan Kshirsagar) यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेतली. याभेटीत व्यापाऱ्यांनी गतवर्षी पासुन सुरु असलेल्या कोरोना काळामुळे अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना व भाजी विक्रेते, फळ विक्रेते आदींना झालेल्या परिणामाची कैफियत मांडली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी धुलीवंदनानंतर संचारबंदीच्या काळात शिथिलता देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, जिल्ह्यातील बीडसह माजलगाव, अंबाजोगाई, धारुर, केज, वडवणी, पाटोदा, गेवराई, शिरुर, परळी तालुक्यात सकाळ पासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. शिथिलता वेळेत धारुरसह अनेक शहरात व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. यास 100% प्रतिसाद मिळाला. धुलीवंदनानंतर संचारबंदीत शिथिलता देण्याच्या आश्वासनामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. व्यापाऱ्यांनी वेळेत बदल करण्याची केलेली मागणी एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफीक, आ.नमिता मुंदडा, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही उचलून धरली.