कोरोंना विशेष

कोरोनाचा कहर; भारताने अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकलं …

दिल्ली दि.7 मे – भारतात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या उच्चांक गाठत असताना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही काळजी वाढवणारी आहे. गुरुवारी एकीकडे देशात 4 लाख 14 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असताना 3927 रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार भारताने अमेरिका आणि ब्राझीलला (US and Brazil) मागे टाकत नवा उच्चांक गाठला आहे.

(The havoc of the corona; India overtook US and Brazil …)

देशात गेल्या 10 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या तीन हजारांच्या पुढे आहे. फक्त गेल्या 10 दिवसांमध्ये देशात 36 हजार 110 जणांचा मृत्यू झाला असून, तासाला सरासरी 150 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सदरील बाब देशासाठी अत्यंत चिंतेची समजली जात आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्राचा (Maharashtra) समावेश पहिल्या क्रमांकावर आहे.

10 दिवसांच्या कालखंडात कोणत्याही देशात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाने इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याचा हा उच्चांक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, याआधी अमेरिकेत 10 दिवसांत सर्वाधिक 34 हजार 798 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यानंतर ब्राझीलचा क्रमांक होता. ब्राझीलमध्ये 32 हजार 692 मृत्यू झाले होते. पण भारताने अमेरिका आणि ब्राझीलला (US and Brazil) मागे टाकलं असून नकोसा उच्चांक नावावर झाला आहे.

दरम्यान दैनंदिन रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांच्या पुढे गेली आहे. बुधवारी 4 लाख 12 हजार 784 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी 4 लाख 14 हजार 554 नवे रुग्ण आढळले. 24 तासांत 13 हून अधिक राज्यांनी 100 हून अधिक मृत्यू झाल्याची नोंद केली होती. यामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात छोटं राज्य असणाऱ्या उत्तराखंडचाही (Uttarakhand) समावेश होता. कुंभमेळ्याचं आयोजन केलेल्या उत्तराखंडमध्ये 151 जणांचे मृत्यू झाला.

महाराष्ट्र (Maharashtra) अद्यापही पहिल्या क्रमांकावर असून 24 तासांच 853 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये 300 हून अधिक तर छत्तीसगडमध्ये 200 हून अधिक मृत्यू झाले. दरम्यान 100 हून अधिक मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये उत्तराखंडसोबत (Uttarakhand) तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, पंजाब, झारखंड, गुजरात आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!