लॉकडाऊन पंधरा दिवस कायम मात्र निर्बंध होतील शिथिल; मुख्यमंत्र्यांची घोषणा.

मुंबई दि.30 मे – राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी कोरोना रुग्णसंख्या, लॉकडाऊन (lockdown), कोरोना लसीकरणासह विविध विषयांवर चर्चा करत आणखी काही दिवस सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

15 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याचे सांगत काही जिल्ह्यात कडक लॉकडाऊन मधून सुट मिळण्याचे संकेत दिले. यावेळी  आपलं गाव कोरोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

(The lockdown will last for fifteen days but the restrictions will be relaxed; CM’s announcement.)

संवादातील प्रमुख मुद्दे.
– शेतीविषयक कामांची दुकानांना शिथिलता देण्यात येणार आहे. पण अशा दुकानांमध्ये जास्त गर्दी होता कामा नये. कोरोनाची बंधन पाळा.
– कोरोनामुक्त गाव ही मोहिम आता आपल्याला राबवायची आहे. याचा पुढाकार महाराष्ट्रानं घ्यायचा आहे. जे देशासाठी पथदर्शी ठरेल.
– हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी आपलं गाव कोरोना मुक्त केलं, असं सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजं.

– जनतेनं सहकार्य केलं नाही तर सरकार काहीही करु शकत नाही. आपण सहकार्य केलं नसतं तर आपणं दुसऱ्या लाटेवर मात करु शकलो नसतो. हे संकट अद्याप संपलेलं नाही.
– मधल्या काळात आपण लॉकडाउनमधून (lockdown) शिथिलता आणण्याचा प्रयत्न केला, त्याचे परिणामही आपण पाहिजे.
– या आठवड्यात उद्योगपतींची भेट घेणार आहे.
पण याला मर्यादा आहे, त्यात लसींचं उत्पादनं महत्वाचं आहे. जसा लसींचा पुरवठा वाढेल तसा आपण लसीकरणाचा (vacccination) वेगही वाढवणार आहोत.

– 45 वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणाची (vacccination) जबाबदारी केंद्रानं घेतलीय. तर 18 ते 44 वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांची आहे.
– तरी सुद्धा लहान मुलांना या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बसू नये यासाठी आपण सध्या जशी काळजी घेत आहोत, तशीच काळजी घेणं गरजेचं आहे.
– तिसरी लाट लहान मुलांमध्ये आली तर घाबरुन जायचं काम नाही. कारण त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा प्रतिकारशक्ती जास्त असते.

– पावसाळ्यातील साथीचे आजार आणि त्यात कोरोनाची लक्षणं त्यामुळं कोविडचा रुग्ण ओळखता येत नाहीत.
– राज्यानं तयार केलेल्या टास्कफोर्समध्ये आपण तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.
– तिसरी लाट आली तर आपण बेड वाढवू पण ऑक्सिजनची कमतरता भासली तर आपल्याला कठीण जाऊ शकतं. त्यातचं आता म्युकरमायकोसिसचा आजारही आला आहे. राज्यात याचे 3000 रुग्ण आहेत.

– राज्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता 1200 मेट्रिक टनची होती तर गरज 1700 मेट्रिक टनची होती.
– कडक लॉकडाऊन नाही पण निर्बंध कायम राहणार
– रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 92 टक्क्यांवर
– फेरीवाल्यांसाठी 52 लाखांचा निधी दिला.
– घरेलू कामगारांच्या खात्यात सरकारनं 34 लाख रुपये जमा केले.
– कोरोना काळात साडेआठशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा
– किनारपट्टीच्या भागात कायमस्वरुपी उपाय योजना करणं गरजेचं
– तौक्ते चक्रीवादळात सराकरनं चांगलं काम केलं.
– महिन्याभरापासून आपण नेमकं कुठ आहेत? आणि पुढे काय करायचं आहे? याची माहिती मी देणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!