कोरोंना विशेष

राज्याची आजची परिस्थिती काय; राज्य शासन आज घेणार मोठा निर्णय.

मुंबई दि.21 एप्रिल- महाराष्ट्रात संचारबंदी लागू करूनही राज्यातील रुग्णसंख्येत अपेक्षित घट होत नसल्याने संपूर्ण लॉकडाऊन (lockdown) लागू करावा, असा सूर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre)आज संध्याकाळी लोकांशी समाज माध्यमातून संवाद साधणार आहेत. यात निर्णय घेऊन तसे आदेश लागू करण्याचे संकेत आहेत.

(What is the state of affairs in the state today; The state government will take a big decision today.)

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन (lockdown) लावण्याची शक्यता गृहित धरलेली असताना कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र कठोर निर्बंध लागू करूनही त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. लोकांना जरब बसविण्यासाठी कठोर उपाय योजण्याची गरज सर्वच मंत्र्यांनी व्यक्त केली. त्यानुसार अत्यावश्यक सेवा आणि सार्वजनिक वाहतूक वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात येणार असून, लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात येईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) आज, बुधवारी याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी बहुतांश मंत्र्यांनी सध्याच्या निर्बंधांना लोक जुमानत नसल्याने कठोर टाळेबंदी लागू करण्याची मागणी केली. बुधवारी रात्री आठपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत बैठकीत निर्णय झाला असून, त्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे मुख्यमंत्री जाहीर करतील, अशी माहिती राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

मात्र, रेल्वे सेवा बंद करण्याची शिफारस राज्य सरकार करणार नाही. औषध दुकाने, रेल्वे, एसटी आणि स्थानिक परिवहन सेवा तसेच भाजीपाला, दूध या सेवा वगळता सर्व व्यवहारांवर निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय झाल्याचे समजते. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी टाळेबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे मत मंत्र्यांनी व्यक्त केले. मंत्र्यांनी मागणी केली असली तरी टाळेबंदी किंवा लोक रस्त्यावर येऊ नयेत म्हणून अधिक कठोर निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगण्यात आले.

राज्यात 62 हजार नवीन रुग्ण.
काल राज्यात 60 हजारापेक्षा कमी नवीन कोरोना रुग्ण (Corona Positive) आल्याचे दिलासादायक चित्र होते. मात्र, पुन्हा मंगळवारी 62 हजार 97 नव्या रुग्णांची भर पडली. दिवसभरात 54 हजार 224 रुग्ण कोरोनामुक्त झाले. गेल्या 24 तासांत तब्बल 519 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात सहा लाख 83 हजार 856 उपचाराधीन रुग्ण आहेत.

देशात 24 तासांत 17,761 कोरोनाबळी.
देशात गेल्या 24 तासांत दोन लाख 59 हजार 170 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळले. याच कालावधीत 1,761 रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन कोरोनाबळींचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने 20 लाखांचा टप्पा ओलांडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!