कोरोंना विशेष

लोकडाऊन करण्याची शक्यता टळलेली नाही, दोन दिवसात निर्णय- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई दि.3 एप्रिल- राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री जनतेशी संवाद साधला. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन (lockdown) लागण्याची शक्यता टळलेली नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) जनतेशी संवाद साधत असताना तिकडे राज्याची सर्वात कोरोना बाधितांची संख्या आढळून आली.

(The possibility of a lockdown has not been ruled out, a decision in two days – Chief Minister Uddhav Thackeray)

जगात सध्या महाराष्ट्र (Maharashtra) कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत चौथा आहे. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्र (Maharashtra) जगात चौथ्या क्रमांकावर आला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक घेत पून्हा दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे:
*घाबरवण्यासाठी आलेलो नाही, मार्ग काढण्यासाठी आलो आहे, घाबरू नका
*राज्यातील परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी मी संवाद साधत आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन आता वर्ष पूर्ण झालं आहे. मधल्या काळात या विषाणूला रोखण्यास आपण यशस्वी झालो होतो.

*कोरोनामुळे जगाची आर्थिक परिस्थिती दोलायमान झाली आहे.
*लोकडाऊन (lockdown) करण्याची शक्यता पूर्णपणे टळलेली नाही.
*लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कोरोना वाढला.

*अडीच लाख चाचण्या राज्यात रोज करणार, केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार चाचण्या होणार. 70 टक्के आरटीपीसीआर चाचण्या करणार.
*लॉकडाऊन होणार का? याचं उत्तर मी आता देत नाही.
“पाचशे चाचण्यांची सेंटर उभारली आहेत, 50 हजार चाचण्या दर दिवसाला करत आहे.

*महाराष्ट्रात 75 हजार चाचण्या करण्याची क्षमता 1 लाख 82 हजार एवढी झाली आहे. पण त्याहीपेक्षा अडीच लाख क्षमता करायची आहे.
*काहीही आपण लपवत नाही आणि लपवणार नाही, सत्य काय आहे ते जनतेसमोर ठेवत आहे.
*मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे मला व्हिलन जरी ठरवलं तरी मला चालेल. गेल्या वर्षी परिस्थिती गंभीर होती बेड्स अब्युलन्स मिळत नव्हती.

*लस घेतल्यावरही काहीजण कोरोना बधित होत आहेत. लस घेतल्यावरही काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क वापरणे आवश्यक आहे. लस घेतल्यावरही कोरोना होणार मात्र त्याची तीव्रता कमी असेल.

*रुग्ण वाढ झपाट्यानं होतं आहे. एकट्या मुंबईत 8 हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहे.
*आज 46 हजारपर्यंत संख्या वाढत चाललेली आहे. सुविधा आपण आवश्यकतेनुसार वाढवत चाललो आहे. बेड्स व्हेटिंलेटर, ऑक्सिजन जरी वाढले तरी डॉक्टर कसे वाढणार? आरोग्य सेवकांना कोरोनानं ग्रासले आहेत.

*अनेक साईड इफेक्ट दिसून येतात. आरोग्य सेवक निगेटिव्ह आल्यानंतर लगेच ते आपल्या सेवेत येत आहेत.
*टेस्टींग वाढवत आहेत, बोलणारे बोलतात लसीकरण वाढवले पाहिजे असं केलं पाहिजे. लसीकरणात एका दिवसात 3 लाख नागरिकांना लस दिलेली आहे.
*65 लाख नागरिकांना आपण लस दिली आहे.

*केद्रानं आणखी लस पुरवली पाहिजे, मी टीका करत नाही लस घेतल्यानंतर मास्क लावले पाहिजे.
*लोकडाऊन करायचं का? यात राजकारण आणू नका. अमेरिका, ब्राझील, रशिया, फ्रान्समध्ये परिस्थिती गंभीर आहे.

*वर्क फ्रॉम होम बंधनकारक, आवश्यक गोष्टींनाच परवानगी त्या ठिकाणी दिलीय.
*लॉकडाऊन टाळू शकतो, पण परिस्थिती बदलत चालली आहे.
*प्रत्येकानं ठरवलं पाहिजे मी कोरानाला हरवणार.
*मी पहिल्या दिवसांपासून सांगतोय तेच आहेत.
*अजुनही कोरोनावर मात करायची आहे.
*राजकीय पक्षाला विनंती आहे, लोकांची जीव जाईल असं वागू नका.
*अर्थचक्र चालवायचं आहे जीव वाचवायचं आहे. मी लॉकडाऊनचा इशारा देतोय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!