
किल्लेधारूर दि.२८(प्रतिनिधी) शहरातील व तालुक्यातील शेतकरी सध्या अडचणीत सापडलेला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्व खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजार उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांवरील दुहेरी संकट टाळण्यासाठी शासनाने तात्काळ तूर, हरभरा व कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
काही दिवसा वरच खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासणार आहे. सध्या शेतकऱ्याकडे तूर, हरभरा, कापूस असे पिक घरात आहेत पण विक्रीसाठी शासकीय खरेदी बंद आहे. शासनाने शासकीय खरेदी सुरु होणार असे सांगितले असल्याने शेतकऱ्यांनी नोंद करुन ठेवली आहे. परंतु अद्याप काहीच निर्णय नसल्याने शेतकरी सध्या अडचणीत सापडलेला आहे.
शासनाने लवकरात लवकर शासकीय खरेदी सुरु केली तर शेतकऱ्यांना त्यांना हक्काचा पैसा मिळणार असल्याने येणाऱ्या खरीप हंगामात त्यांना पेरणीसाठी हा पैसा उपयोगी पडणार आहे. जर शासकीय खरेदी लवकर चालू केली नाही तर त्यामुळे शेतकरी मोठा अडचणीत येईल व खरीप हंगामावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येईल यासाठी शासकीय खरेदी केंद्र लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी अनिल महाजन, विजय शिनगारे, अतुल शिनगारे, दिनेश कापसे, ईश्वर खामकर, हरिभाऊ मोरे, लखन सिरसट, दिलीप सिरसट, सुग्रिव चोले आदी उपस्थित होते.