Monsoon शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी… मान्सूनचे केरळात आगमन.

मुंबई दि.8 जून – Monsoon गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या नजरा पावसाच्या आगमनाकडे लागले आहे. प्रतिवर्षी 1 जूनला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा 8 जूनला दाखल झाला आहे. मृग नक्षत्रात मान्सूनचे आगमन होवून केरळात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण असून पुढील आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने Indian Meteorological Department वर्तवला आहे. Monsoon… Good news for farmers… Monsoon has arrived in Kerala.
गेली चार दिवस महाराष्ट्रात प्रचंड उष्णतेची लाट आली आहे. सर्वसामान्य जनता उकाड्याने त्रस्त असून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आभाळाकडे डोळे लावून आहे. यातच अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ Cyclone Biperjoy आल्याने मान्सूनच्या आगमनावर परिणाम जाणवण्याचा अंदाज होता. मात्र चक्रीवादळ Cyclone Biperjoy पुढे सरकत मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होवून केरळात मान्सूनची इंट्री झाली. याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने Indian Meteorological Department केली. यामुळे देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
केरळ किनारपट्टीवर मान्सून धडकला असून तेथे जोरदार पाऊस सुरू झाला. केरळसह तो दक्षिण तामीळनाडू किनारपट्टीवर देखील आला आंहे. आगामी 24 तासांत तो संपूर्ण अरबीसमुद्रात, तामिळनाडू, म्यानमार सह बंगालच्या उपसागरातही प्रवास करणार आहे. तळकोकणात 12 जून तर उर्वरित महाराष्ट्रात 15 जून पर्यन्त मान्सूनचा Monsoon पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ Cyclone Biperjoy क्षीण होईपर्यंत पाऊस कमी प्रमाणात होईल असाही अंदाज भारतीय हवामान खात्याने Indian Meteorological Department वर्तवला आहे.