कोरोंना विशेष

दुसरी लाट अजूनही कायम… केंद्र सरकारचा राज्यांना इशारा.

मुंबई दि.3 जुलै – देशात कोरोनाची दुसरी लाट (The second wave) ओसरत नाही तर तिसऱ्या लाटेचं संकेत सरकार आणि आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आले आहेत. देशात कोराना व्हायरसची दुसरी लाट पूर्णपणे संपली नसताना लसीकरणावर भर देणे आणि नियम-निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला राज्यांना दिला. कोरोनाचा प्रादूर्भाव (Corona outbreak) सुरूच आहे, लोकांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचे असल्याचे महामारीच्या परिस्थितीबद्दल एका अधिकाऱ्याने सांगितले.
(The second wave is still going on … Central government’s warning to the states.)

दुसरी लाट अजूनही कायम आहे, असा इशारा केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. छोट्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव (Corona outbreak) सुरूच आहे. देशात अजूनही 71 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर 10 टक्क्यांहून अधिक आहे. केरळ, छत्तीसगड, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा आणि मणीपूर या सहा राज्यांमध्ये रूग्णसंख्या परत वाढायला लागली आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे. लसीकरण भर आणि नियम, निर्बंध (restrictions) पाळण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिला आहे. 21 जूनपासून देशात दररोज सरासरी 50 लाख लोकांना लस दिली जात असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाची लाट थोपवण्यासाठी निर्बंधांचं (restrictions) पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. असं वारंवार सांगण्यात येत आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) दररोज 9 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण (Corona patients) सापडत होते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेकडून चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान काल दि.2 जुलै रोजी कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसभरात 156 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 8 हजार 753 नव्या कोरोना रुग्णांची (Corona patients) नोंद करण्यात आली आहे. तर शुक्रवारी एकूण 8 हजार 385 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!