उपोषणकर्त्यांच्या मागणीचा विचार करणार नाही- अकेले

चौथ्या दिवशीही प्रश्न मार्गी लागेपर्यंत माघार नाही- उपोषणकर्ते

शिवनगर तांड्यात पाणी प्रश्नी उपोषणाचा चौथा दिवस

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) तालुक्यातील अंजनडोह येथील शिवनगर तांडा पाणी याप्रश्नी कायमस्वरुपी तोडगा निघेपर्यंत उपोषणातून माघार घेणार नसल्याची प्रतिक्रिया चौथ्या दिवशीही उपोषणकर्ते युवराज आडे यांनी दिली असून याच प्रश्नी गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी उपोषणकर्त्यांनी केलेली प्रत्येक मागणी पुर्ण करणे प्रशासनास शक्य नसल्याचे सांगत पाणी प्रश्नी दुपारपर्यंत बोअर अधिग्रहण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती दिली. या दरम्यान उपोषणकर्त्यांना अनेकांचा पाठिंबा मिळत असून त्यांची प्रकृती वरवर ढासळत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

तालुक्यातील अंजनडोह येथील शिवनगर तांडा पाणीप्रश्नी दि.१२ पासून आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या या उपोषण स्थळास दि.१४ गुरुवार रोजी नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी भेट दिली. तांड्याची पाणी टंचाई कायमस्वरुपी दुर करावी, गतवर्षीच्या अतिग्रहणाचे देयक अदा करावी अशी मागणी उपोषणकर्त्याची आहे. याबाबतीत गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना विचारले असता ग्रामपंचायतने अधिग्रहणाचा प्रस्ताव दिला असून आज दुपारपर्यंत प्रश्न निकाली निघण्याची शक्यता वर्तवली. इतर प्रश्नाचे उत्तर देताना अकेले यांनी उपोषणकर्त्यांनी केलेल्या सर्वच मागण्या मान्य करणे शक्य नसल्याचे सांगितले. तर उपोषणकर्ते युवराज आडे यांनी आजही सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची माहिती दिली. दरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आहे. या उपोषणास अनेकांचा वाढता पाठिंबा पाहता प्रशासनास कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!