महाराष्ट्रात आठ दिवसात एक लाख कोरोना बाधित रुग्णांची नोंद; मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी दिले हे संकेत

मुंबई दि.15 मार्च – महाराष्ट्रात (Maharashtra) झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. कोरोनावर (Corona virus) नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातील विविध शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वांना आणखी चिंतेत टाकणारी एक माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या आठ दिवसात जवळपास एक लाख कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल पुन्हा कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका असा सुतोवाच केला आहे. कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या अशीच वाढत गेल्यास राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(One lakh corona infected patients registered in Maharashtra in eight days; This was indicated by the Chief Minister and the Health Minister)
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी (8 मार्च) 8 हजार 144, मंगळवारी (9 मार्च) 9 हजार 927, बुधवारी (10 मार्च) 13 हजार 659, गुरुवारी (11 मार्च) 14 हजार 317, शुक्रवारी (12 मार्च) 15 हजार 817, शनिवारी (13 मार्च) 15 हजार 602, रविवारी (14 मार्च) 16 हजार 620 अशी एकूण 8 दिवसात 94 हजार 86 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसत आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत अशीच वाढ होत गेली तर, लॉकडाऊन (lockdown) लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Corona virus) अटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत असताना अचानक मागील दोन आठवड्यात रुग्णांच्या संख्येत भरमासाठ वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. कोरोनावर 100 टक्के गुणकारी ठरेल, अशी लस अद्याप आली नसून नागरिकांनी तोंडावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि वारंवार हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधातही कडक कारवाई केली जात आहे.
राज्यात आज 8 हजार 861 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 21लाख 34 हजार 72 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 26 हजार 231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.
कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नका, हा शेवटचा इशारा आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
काल दि.14 रविवारी नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दुरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी बोलताना, गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरू केले आणि त्यानंतर सुमारे 4 महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला, पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thakre) यांनी स्पष्ट केले.
मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांने मास्क न घालता व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी केल्याचा अनुभव आला होता. हॉटेल आणि उपहारगृहांमध्ये सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेलांमध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर आणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल, मॉल, उपहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले. लॉकडाऊन (lockdown) लावून सगळे बंद करणे कोणालाही आवडणार नाही. आपण हे अर्थचक्र सुरू केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल, त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Udhav Thakre) म्हणाले.