बीडसह या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा….या १८ जिल्ह्यात येलो अलर्ट

मुंबईः दि.७- राज्याच्या हवामानखात्याने बीडसह चार जिल्ह्यात आजपासून तीन दिवसात गारपिट व मुसळधार पावासाचा (Hail warning) अंदाज वर्तविला आहे. शिवाय १८ जिल्ह्यात पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सावधनता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बंगाल सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तर भारतात सध्या तुफान पाऊस व गारपिट (Hail warning) होत आहे. यानंतर आता महाराष्ट्रातही हे संकट घोंघावत असून कुलाबा वेधशाळेने मुंबई व कोकणात हलका तर बीड (Beed), सोलापूर, जालना व अकोला जिल्ह्यात पुढील तीन दिवसात गारपिट व मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय उस्मानाबाद, बीड(Beed), लातूर, जालना, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ, वाशिम, वर्धा, अकोला, नागपूर, बुलढाणा, अमरावती, सिंधूदुर्ग, रत्नागिरी या १८ जिल्ह्यात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देत येलो अलर्ट दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!