१० बालकांच्या जळीत प्रकरणी आले सत्य समोर…

भंडाराः दि.२१- भंडारा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात बालक केअर युनिटमध्ये (SNCU) शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) लागलेल्या आगीत १० बालकांचा होरपळून मृत्यू (Death) झाला होता. राज्य सरकारने या प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीने काल सादर केलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद करत दोन परिचारिकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचा ठपका ठेवला आहे.

भंडारा (Bhandara) जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये (SNCU) ९ जानेवारीच्या मध्यरात्री आग लागली होती. या आगीत तीन बालकांचा होरपळून तर सात बालकांचा धुरात गुदमरून मृत्यू (Death) झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा (Bhandara) जिल्हा रुग्णालयाला भेट दिली होती. या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या चौकशी समितीने आरोग्य विभाग, अग्निशमन दल, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, व आरोग्य कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी दोन दिवस अभ्यास करून त्यांचे अंतिम मत नोंदवून या समितीने पन्नास पानांचा अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाला सादर केला आहे. या अहवालात शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) एसएनसीयूमधील बॉडी वॉर्मरला आग लागली. काही वेळाने ही आग आऊटबॉर्न विभागात पसरली. या युनिटमध्ये आग लागली त्यावेळी तेथे कोणीही उपस्थित नव्हते. जर त्यावेळी युनिटमध्ये परिचारिका थांबल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती असे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. समितीने जिल्हा शल्य चिकित्सक व इतर संबंधितांवरही ठपका ठेवला आहे. यातील कोणावर कारवाई करायची हे सरकारने ठरवायचे असे समितीने अहवालात नमूद केले आहे. चौकशी समितीने उपायोजनाही सुचवल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!