पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू
भोकरदन दि.१९- तालुक्यातील पळसखेड पिंपळे येथील पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तीन सख्ख्या भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रात्री घडली. यातील एका भावाचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेले असून इतर दोघे भाऊ औरंगाबाद Aurangabad येथे कंपनीत नोकरी करत होते. ते लाकडाऊन Lockdown मध्ये घरी गावातच राहत होते. त्यांचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पळसखेड पिंपळे येथील धानेश्वर आप्पासाहेब जाधव (२६), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (२६) व सुनील आप्पासाहेब जाधव (१८) हे तिघे भाऊ दि.१८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता जेवण करून शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले. यावेळी विद्युत पंप सुरू करत असताना एकाला वीजेचा धक्का बसला. तोल जावून तो विहिरीत पडला, त्याला वाचविण्यासाठी दोघांनी विहिरीत उडी मारली मात्र अंधार असल्याने या तिन्ही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उशीर होवूनही तिघे घरी आले नसल्याने काळजीत पडलेल्या कुटूंबातील आई, वडील व धानेश्वर च्या पत्नीने नातेवाईकांना सांगितले. शोध घेत असताना रात्री २ च्या दरम्यान ते विहिरीत पडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस Police ठाण्याचे स.पो.नि. संतोष घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला असून तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढली.