Adjustment of teacher वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकाचे समायोजन ; पालकांतून विरोधाची शक्यता.

बीड दि.24 जून – Adjustment of teacher वीसच्या आत पटसंख्या असलेल्या शाळांमधील दोन शिक्षकांपैकी एक शिक्षकाचे समायोजन प्राथमिक पदवीधर graduate यांच्या रिक्त जागेवर करण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेत सुरु असून यामुळे एक शिक्षक इतर शाळेवर जाणार आहे. यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे हे समायोजन करताना वाडी, वस्तीवरील गोरगरीबांचे विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचीत राहणार नाहीत याची काळजी जिल्हा परिषद प्रशासनाने घ्यावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
Adjustment of teacher in a school with less than twenty ; Possibility of opposition from parents.
सध्या जिल्हा परिषदेच्या ZP वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळंमधील एका शिक्षकाचे समायोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील रिक्त असलेल्या प्राथमिक पदवीधर graduate यांच्या रिक्त जागेवर करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात दि.22 जून रोजी बैठकही घेण्यात आली असून आज दि.24 जून शनिवारी अशा शिक्षकांची बैठक आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे. कालच (दि.23) कमी शिक्षक असल्या कारणामुळे धारुर तालुक्यातील गांवदरा येथील आदर्श शाळेतील पालकांनी parents आक्रमक पावित्रा घेवून शाळेला कुलूप ठोकल्याची घटना घडली. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळेही पालकातून विरोध होण्याची शक्यता आहे.
काय होणार परिणाम-
1 ते 20 पटसंख्या असलेल्या या शाळांमधील एका-एका शिक्षकाचे समायोजन रिक्त जागांवर करण्यात येणार असल्यामुळे एकाच शिक्षकावर इयत्ता 1 ली ते 4 थी या चार वर्गाचा भार पडणार आहे. त्याचबरोबर कार्यालयीन बैठका तसेच टपालासाठी शाळा बंदही राहू शकते. पर्यायाने याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. टपाल, बैठकी व इतर कामासाठी एका शिक्षकाची धावपळ सुरु असते. यातच दोन पैकी एका शिक्षकाचे समायोजन केल्याने त्याचबरोबर बहुतांश शाळा या ग्रामीण भागातील असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांवर याचा प्रत्यक्ष परिणाम होणार आहे. शाळेत एकच शिक्षक राहिल्यास असलेला पट सुद्धा कमी होऊन संबंधीत शाळा भविष्यात बंद पडण्याचा धोकाही संभवतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर होऊन शाळाबाह्य राहू शकतात. शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जावे अशी तरतूद आहे. प्राथमिक शाळेमध्ये कमीच कमी दोन शिक्षक असणे आवश्यक आहे. एका शिक्षकाचे इतरत्र ठिकाणी समायोजन केल्यास एका शिक्षकावर संपूर्ण शाळेचा कारभार चालणार कसा? याचा पूर्ण विचार करुन जिल्हा परिषद ZP प्रशासनाने धोरण ठरवावे अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.