शैक्षणिक

दहावी पाठोपाठ बारावीच्या परीक्षा बाबत राज्य शासनाने मांडली ही भुमिका;

मुंबई दि.24 मे – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केंद्रीय स्तरावर काल घेण्यात आलेल्या बैठकीत भूमिका मांडली. ‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे सूत्र केंद्रीय पातळीवर समान असावे, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन मंडळाच्या परीक्षेव्यतिरिक्त इतर मार्गानी करणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे,’ असे गायकवाड म्हणाल्या.

(This is the role played by the state government regarding the 12th and 12th examinations.)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (CBSE) इतर केंद्रीय, आंतरराष्ट्रीय मंडळे, राज्यमंडळ यांनी दहावीची परीक्षा (10th exam) रद्द केली. त्यानंतर बारावीची परीक्षाही रद्द करण्याची मागणी पालकांनी केली. त्या अनुषंगाने केंद्रीय स्तरावर रविवारी बैठक घेण्यात आली.

राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा (10th exam) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीच्या परीक्षा मात्र घेतल्या जातील असं देखील सांगितलं होतं. सीबीएसई (CBSE) बोर्डानं देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी काल पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी, किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून गायकवाड यांनी सहभाग घेतला.

बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या संदर्भात चर्चा करु. बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनचं यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली.

केंद्रीय मंत्री मंडळासोबत झालेल्या बैठकीत, राज्यातील कोरोना विषाणू (Corona virus) संसर्ग परिस्थिती आणि मुलांची मानसिक तयारी याबाबत मंत्री वर्षा गायकवाड यांनी अवगत केले. राज्य सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी करीत आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे धोकादायक ठरू शकते. विद्यार्थ्यांचे तातडीने लसीकरण करणे, त्यांना परीक्षेसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. असेही गायकवाड यांनी यावेळी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करताना लसीकरण (Vaccination) हा महत्वाचा भाग आहे.

विद्यार्थ्यांचं लसीकरण (Vaccination) करण्यासाठी पुढाकार केंद्रानं पुढाकार घ्यावा, अशी मागणी बैठकीत मांडली. कोरोना विषाणूच्या (Corona virus) तिसऱ्या लाटेबद्दल आपल्याला माहिती आहे की, जसं सांगितलं जातेय की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जादा धोका असल्याचं वर्तवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख आहे.

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या 25 हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना सुरुक्षित वातावरणात केली पाहिजे. बारावीची परीक्षा महिनाभरानंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्यांचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यमापन कसे करावे, याबाबत अद्यापही निर्णय घेऊ न शकलेल्या राज्याच्या शिक्षण विभागाने बारावीच्या परीक्षेसाठीही पर्याय शोधायला हवा, अशी भूमिका केंद्रीय स्तरावरील रविवारच्या बैठकीत घेतली. त्यामुळे दहावीपाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करण्याकडे राज्याचा कल असल्याचे दिसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!