कोरोंना विशेष

परभणी व अकोल्यात लॉकडाऊन; बीड जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनकडे….

बीड/परभणी दि.12 मार्च- महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Corona virus) संसर्गाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. वाढत्या संकटाला ध्यानात घेऊन आज अकोला (Akola) आणि परभणीमध्ये (Parbhani) लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यातही कोरोनाने शंभरी ओलांडली आहे. यामुळे बीडलाही लॉकडाऊनचा सामना करावा लागतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पुण्यात आज पासून लॉकडाऊन नसले तरी कठोर निर्बंधाची अंमलबजावणी सुरु होत आहे.

(Lockdown in Parbhani and Akola; Beed district on its way to lockdown ….)

दिवसेंदिवस पुण्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर येथे लॉकडाऊन (Lockdown) लागू केला नसला तरी कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. त्याची अंमलबजावणी शुक्रवारी (दि. 12) रात्रीपासून केली जाणार आहे. तसेच येत्या 31 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले की, पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निश्चित केलेल्या निर्बंधांनुसार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजता बंद करण्यात येणार आहेत.

परभणीमध्ये (Parbhani) सोमवारी रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 12 वाजेपासून परभणीमध्ये लॉकडाऊन सुरू होईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. ते म्हणाले की आम्ही परभणी आणि इतर शेजारच्या जिल्ह्यातील जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्स, मॉल खुले असतील तर 31 मार्चपर्यंत शाळा व महाविद्यालये बंद राहतील.
त्याचबरोबर अकोल्यात (Akola) शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 या वेळेत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे कोरोना व्हायरसची (Corona virus) वेगाने होणारा संसर्ग पाहता गुरुवारी नागपुरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. नागपुरात १५ ते २१ मार्च दरम्यान ‘कडक लॉकडाउन’ सुरू राहणार आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितीन राऊत म्हणाले होते की लॉकडाऊन दरम्यान खासगी कार्यालये बंद राहतील तर सरकारी कार्यालयांमध्ये २५ टक्के कर्मचारी असतील. जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा करणारी दुकाने खुली राहतील. अल्कोहोलची विक्री केवळ ऑनलाइन होईल.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यापूर्वीच अधिक निर्बंध लावून कठोर कारवाई केली जात आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपुर, अहमदनगर व विदर्भातील काही जिल्ह्यात प्रशासनाने कठोर पाऊलं उचलली आहेत. गेल्या काही दिवसांत बीडची (Beed) कोरोना संसर्गाचा वेगही वाढला आहे. आज जाहिर झालेल्या आकडेवारीनूसार एकट्या बीड (Beed) तालुक्यात शंभर तर जिल्ह्यात 163 पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातही प्रशासन ठोस निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!