अंबाजोगाईत किरीट सोमय्या यांचा मंत्री धनंजय मुंडेवर आरोप; शेतकऱ्यांचे 83 कोटी घेतले.

बीड दि.16 डिसेंबर – भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या यांनी अंबाजोगाई गाठत पत्रकार परिषद घेतली. यावेळी  धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जगमित्र कारखाना लुटला. तब्बल 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून घेतले, असा आरोप आज गुरुवारी सोमय्या यांनी केला.

(Kirit Somaiya’s allegations against Minister Dhananjay Munde in Ambajogai; 83 crore taken from farmers.)

सोमय्या म्हणाले, काल मी ईडीकडे (ED) तकार (complaint) केली आहे. मृत माणसांच्या नावावर पैसे लुटले. पोलिसांचा (Police) उपयोग माफियासारखा करत आहेत. मी बर्दापूर पोलीस ठाण्याला जावून पोलिसांना विनंती करणार आहे. फसवणूक केली असेल तर मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसंच आता किरीट सोमय्या बर्दापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज धनंजय मुंडेंच्या जगमित्र शुगर मिल्स (Jagmitra Sugar Mills) जागेची पाहणी केली. शिवाय ज्यांच्या जमिनी कारखान्याच्या जागेसाठी गेल्या त्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवरती अनेक गंभीर आरोप करत टीकाही केली. ते म्हणाले, ‘धनंजय मुंडेंच्या गुंडांनी मिरची ची धमकी दिली, मी या माफियाबाज सरकारचे घोटाळे समोर काढले म्हणून अनेक ठिकाणी मला हल्ल्याची धमकी दिली असल्याचं सोमय्या म्हणाले.

राज्य सरकार म्हणजे चोर मचाये शोर…
सोमय्या म्हणाले की, मला धमकी देणारा शोधतोय. मात्र, अद्याप मिळाला नाही. धनंजय मुंडेंच्या बायका आणि लेकरे किती आहेत माहीत नाही. मी घोटाळे काढले की, मला मुर्दाबाद म्हणतात. इथे मात्र मिरचीची धमकी देण्यात आली. मी घोटाळा काढला. आता, तुझे मिरची लगे तो मै क्या करू, असे म्हणत त्यांनी टोलेबाजी केली. शिवाय हे सरकार म्हणजे चोर मचाये शोर, असल्याचा आरोप केला.

मुख्यमंत्र्यांना इशारा…
सोमय्या यांनी यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही टीका केली. राऊत यांना मी प्रश्न विचारला की, ईडीच्या कार्यालयात पाठीमागून 55 लाख रुपये घेऊन कोण गेले? संजय राऊत यांनी ईडीची नोटीस फाडली. मग कारवाईला भिऊन 55 लाख रुपयांचा चेक दिला. हे काय समजतात, मला माहित नाही. महाराष्ट्रात ज्यांनी-ज्यांनी घोटाळे केले त्यांची चौकशी होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अलिबाग येथे 19 बंगले बांधले. चोरी का माल वापस करणे से चोरी की सजा माफ नहीं होती, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ईडीकडे तक्रार केली
किरीट सोमय्या म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांची हजारो कोटींची संपत्ती सापडली आहे. अजित दादांनी (Ajit Pawar) जरेंडश्वर कारखाना लुटला आणि धनंजय मुंडेंनी जगमित्र लुटला. 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून घेतले. काल मी ईडीकडे तकार केली आहे. मृत माणसांच्या नावावर पैसे लुटले. पोलिसांचा उपयोग माफियासारखा करत आहेत. मी बर्दापूर पोलीस ठाण्याला जावून पोलिसांना विनंती करणार आहे. फसवणूक केली असेल तर मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. धनंजय मुंडेंच्या कुटुंबांवर मला बोलायचे नाही. मात्र, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या ऑर्थर रोड खोली नंबर एकशेजारी आता खोली नंबर दोन बुक करून ठेवल्याचा इशारा त्यांनी दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!