कोरोंना विशेष

कोरोनाने पुन्हा फास आवळला…. राज्यभर सतर्कता…. कारवायांना सुरुवात. केंद्रेकरांनी दिले कडक निर्बंधाचे स्पष्ट आदेश…

लग्न समारंभावर विशेष लक्ष

औरंगाबादः दि.१७- देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या गर्दी आणि समारंभांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढून झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असून हा नवीन कोरोना स्ट्रेनचा प्रकार असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Udhav Thakre), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या सुचनेनंतर काल विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व मुख्याधिकाऱ्यांना कडक कारवाई करुन कठोर निर्णय घेण्याची सुचना केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या सुचनेनंतर राज्यात कारवाया करण्यास प्रशासनाने सुरुवात केल्याचे दिसत आहे. नागपूर शहरातील विविध भागातील विवाह समारंभात वऱ्हाडाच्या झालेल्या गर्दीमुळे महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाने मंगळवारी आठ मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून ३७ हजारांचा दंड वसूल केला. राज्य सरकारने लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी दहावी-बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र, कोरोनाच वाधता उद्रेक पाहता वर्ग बंद करण्याचे आदेश अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत.

सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, ज्येष्ठ नागरिकांना धोक्यात आणतो आहोत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) हवा की थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, असे सांगतानाच नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thakre) यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कोरोना (Corona) रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

यावेळी ठाकरे यांनी खालील सूचना करत
पुन्हा कडक निर्बंध लावली आहेत.

– लग्नसमारंभ, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रमात आरोग्यविषयक नियम पाळले जात नसतील तर कारवाई होणार
– उपाहारगृह, हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास परवाना होऊ शकतो रद्द
– ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांचे परवाने रद्द होणार
– कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल
– सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंचे पालन होत नसल्यास कारवाई होणार
– जिथे कंटेन्मेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
– कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करून एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधावेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत आढळून आलेल्या सहव्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करावी.
– ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन (Lockdown) उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!