बीड जिल्ह्यात तीन दिवसात दुसरी दुर्दैवी घटना ; 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू .

39 / 100

बीड दि.29 जुलै – बीड जिल्ह्यात तीन दिवसात दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे. रानडुकराच्या बचावासाठी बागेला लावलेल्या संरक्षण जाळीला चिटकून एका 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मुत्यू आज पहाटे झाला. सदर घटना आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील घडली.

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे घराच्या काही अंतराला लागुनच डाळिंब बाग आहे. या ठिकाणी रानडुकरांचा मोठा उपद्रव असतो. बागेचे नुकसान होत असल्याने शेतकर्‍याला मनस्ताप सहन करावा लागत असल्याने त्या बागेला रानडुक्करांपासुन बचाव व्हावा म्हणून संरक्षण जाळीला विद्युत प्रवाह सोडला होता. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता माणिक नरवडे यांचा मुलगा अमोल माणिक नरवडे (वय 30 वर्ष) हा बागेची पाहणी करण्यासाठी गेला होता. पण विद्युत प्रवाह बंद करण्याचे विसरल्याने त्याला जीव गमवावा लागला. विद्युत प्रवाह असलेल्या संरक्षण जाळीला चिटकून त्याचा दुर्देवी मुत्यु झाला. त्याच्या मुत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तीन दिवसांत दुसरी घटना
बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धामसला येथे मंगळवारी दि.26 रानडुकरा पासुन संरक्षण मिळावे यासाठी ऊसाला लावलेल्या तारेचा करंट लागुन एका 40 वर्षीय शेतकऱ्याचा व शेळीचा मृत्यू झाल्याची घडली होती. नंदु उद्धव थोपटे (वय 40) असे तारेचा करंट लागुन मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नावं आहे. ते मंगळवारी सांयकाळच्या सुमारास आपल्या शेतात काम करून घरी येत होते. यावेळी सोबत असलेली शेळी ऊसात गेली. ती शेळी पाहण्यासाठी गेले असता तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

( Second unfortunate incident in three days in Beed district; Death of a 30-year-old man. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!