रेशनिंगच्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या युवकांचा पुढाकार

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर)महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्य लॉकडाऊन केले आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला धान्य पुरवठा करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडून अडचणी येत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने महाराष्ट्र शासनाने सदरील लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढवले आहे. अशा भिषण संकटात सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र शासनाने मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू रेशनींग प्रकरणी तक्रारी वाढत असल्याने आ. प्रकाशदादा सोळंके यांनी कार्यकर्त्यांना जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. जि.प. चे अर्थ व नियोजन सभापती जयसिंगभैय्या सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रेशनिंग समस्या सोडविण्यासाठी स्वंतत्र कार्यकर्त्यांचा संघ करण्यात आला आहे. जर दुकानदार धान्य नियमाप्रमाणे देत नसेल, शासनाने ठरवुन दिलेल्या रकमे पेक्षा जास्त रक्कम घेत असेल, धान्य देत नसेल, ग्राहकांची अडवणूक करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या संघाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या संघात शहराध्यक्ष
नितिन शिनगारे 9762551111,
गणेश सावंत 9273303065,
विश्वास शिनगारे 9804741111,
सय्यद रज्जाक 9860652371,
शेख शाहेद 9960435253,
सुनिल कावळे 9970208444,
रोहित गायकवाड 9561868117,
मुजायद मोमीन 9860360098,
पप्पु शेटे 9271972111,
प्रदिप नेहरकर 9689955525,
धम्मानंद गायसमुद्रे 9960808276,
अमोल शेळके 8657848444,
दादा शेरकर 8802635555,
जोतिराम शहाने 9890462525 यांचा समावेश आहे.