दिपावलीत महाराष्ट्राचे दोन सुपूत्र शहीद; पाकिस्तानकडून ऐन दिवाळीत शस्त्रसंधीचे उल्लंघन

नवी दिल्ली:दि.१४- कुरापतखोर पाकिस्तानने Pakistan ऐन दिवाळीत Diwali शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना नियंत्रण रेषा भागात गोळीबार केला असून त्यात शहीद झालेल्या तीन जवानांपैकी दोन जवान महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळाली आहे. कोल्हापूर Kolhapur आणि नागपूर Nagpur येथील दोन जवानांना काश्मीर Kashmir येथे सुरू असलेल्या धुमश्चक्रीत वीरमरण पत्करावे लागले आहे. नागपूर Nagpur येथील भूषण रमेश सतई आणि कोल्हापुरातील Kolhapur ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या दोन जवानांना पाक Pakistan सैन्याशी लढतान वीरमरण आले आहे.

देशभर दिपावली Diwali साजरी करण्यात देशबांधव व्यस्त असताना ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी पाकिस्तानने Pakistan शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या India दिशेने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. मॉर्टर आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीला भारताने India जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे काही बंकर तसेच दहशतवाद्यांचे नियंत्रण रेषेजवळचे लाँचपॅड उध्वस्त झाले. भारताने जबर दणका दिला. प्राथमिक वृत्तानुसार पाकिस्तानच्या किमान ११ जवानांचा मृत्यू झाला आणि १६ जवान जखमी झाले. काही दहशतवादीही ठार झाले. मात्र यात महाराष्ट्रातील नागपूरचे भूषण रमेश सतई आणि कोल्हापुरातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या दोन जवानांना लढताना वीरमरण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!