धारूर तालूक्यात ४१ गावात ३१५ ऊसतोड कामगार परतले;
कामगारांंचे केले अलगीकरण

किल्लेधारूर दि.२२ (वार्ताहर ) कोरोना चे लाॕकडाऊन व जिल्हाबंदी मुळे ऊसतोड कामगार जागोजागी अडकले होते. त्यांना मुळगावी जाण्याची परवानगी देताच धारूर तालूक्यातील ४१ गावातील ३१५ ऊसतोड कामगार एका दिवसात परतले असून या सर्व कामगारांना घरात किंवा शेतात अलगीकरण मध्ये ठेवण्यात येवून गाव सुरक्षा समिती या वर लक्ष ठेवणार असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.
कोरोना मुळे महिन्या पासून सर्वञ लाॕकडाऊन असून जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याने पश्चीम महाराष्ट्र व इतरञ साखर कारखाण्यावरच किंवा प्रवासात वेगवेगळ्या ठिकाणी कामगार अडकले होते. यात कामगारांची मोठी गैरसोय होत होती. या कामगारांना त्यांच्या मुळ गावात जाऊ द्यावे असा आदेश राज्य शासनाने नुकताच काढला. कारखाण्यांनी हि जबाबदारी घ्यावी असे सांगण्यात आले. दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी घेवून त्या जिल्ह्यात पाठवावे. गावात गेल्या वर घरी किंवा शेतात अलगीकरणात ठेवावे व गाव सुरक्षा समितीने त्यांचे वर नियंत्रण ठेवण्याबाबत चे सुचना देण्यात आल्या आहेत. धारूर तालूक्यातून मोठ्या संख्येने ऊस तोड कामगार प्रतिवर्षी जात असतात. यातील काही मजूर परतले माञ काही कामगार कारखाण्यावर अडकले होते. शासनाच्या निर्णयानंतर जिल्हाबंदी मुळे रस्त्यात अडकलेले कामगार येण्यास सुरुवात झाली आहे. मुळगावी जाण्याची परवानगी मिळताच तालूक्यात ४१ गावात ३१५ मजूर एक दिवसात परतले असून त्यांना घरी किंवा शेतात अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. गाव सुरक्षा समिती यांचे वर नियंञण ठेवणार आहे. या कामगारानी शासनाचे सुचनाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन तालूका आरोग्य आधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी केले आहे.