केंद्रीय गृहसचिवांची देवेंद्र फडणवीस घेणार भेट; गुजरात सरकारवर कारवाई करण्यासाठी गोंधळ घालणार का, असा संजय राऊतांचा टोला

मुंबई दि.23 मार्च – माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीकडून सचिन वाझे भेटीचा दावा फेटाळण्यात आला आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीकडून शरद पवार (Sharad Pawar) यांना चुकीची माहिती देण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणातील फोन टॅपिंगचे आणि इतर सर्व सबळ पुरावे घेऊन आज दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटून याबाबतची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

(Union Home Secretary to meet Devendra Fadnavis; Will there be any confusion to take action against Gujarat government, asked Sanjay Raut)

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी, काल शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत परमबीर सिंह यांचे दावे खोटे असल्याचं सांगितलं. गृहमंत्री नागपुरात होम क्वारंटाइन होते असं शरद पवार सांगत होते. मी तात्काळ एक व्हिडीओ प्रसिद्ध करत अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी घेतलेली पत्रकार परिषद दाखवली. पण हे सगळं खरं नाही. अनिल देशमुख खासगी विमानाने आले होते. माझ्याकडे मुंबई पोलिसांचे दोन मॅनिपेस्ट आहेत. शरद पवारांना (Sharad Pawar) चुकीची माहिती देण्यात आली. एवढ्या मोठ्या नेत्याच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेत उघडं पाडलं. यामागे कोण आहे याचा विचार राष्ट्रवादीने करायला हवा. विलगीकरणात असतानाही अनिल देशमुखांनी अनेकांच्या भेटी घेतल्या आहेत,” असा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यावेळी केला.

संजय राऊत (Sanjay Raut) यांचा टोला
एका अधिकाऱ्याच्या पत्रावरुन भाजप नेते राज्यसभेत, लोकसभेत आणि महाराष्ट्रात गोंधळ घालत आहेत, संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. सरकार बरखास्तीची मागणी करत आहेत. जर हाच न्याय त्यांना लावायचा असेल तर गुजरातच्या सरकारवर कारवाई करणार का ? सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि शर्मा नावाच्या आयएएस अधिकाऱ्यांनी यापेक्षा गंभीर आरोप केले होते. मग त्या सरकारवर किंवा गुजरातच्या मुख्यमंत्र्यावर कारवाई करणार का, असा रोखठोक सवाल शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केला आहे. संसदेत थयथयाट करणारे भाजप नेते गुजरात सरकारवर कारवाई करण्यासाठी गोंधळ घालणार का, असा टोला ही त्यांनी लगावला.

यावेळी संजय राऊत यांनी तत्कालीन सरन्यायाधीश आणि विद्यमान राज्यसभा सदस्य तरुण गोगोई यांचा दाखल देत न्यायव्यवस्थेवरही भाष्य केले. संजय राऊत पुढे म्हणाले की, एका पोलिस अधिकाऱ्याच्या पत्रावर जर तुम्ही एखाद्या मंत्र्याचा आणि सरकारचा राजीनामा मागत असाल तर माझा गोंधळ घालणाऱ्यांना आणि पत्रकार परिषदेत आरोप करणारे कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांना प्रश्न आहे. आयपीएस संजीव भट्ट, शर्मा यांनी त्यावेळी गुजरातच्या राज्य सरकारबाबत वारंवार लेटर बॉम्ब टाकले आहेत. त्या पत्रांच्या आरोपांवरुन तुम्ही गुजरातच्या मुख्यमंत्री यांच्यावर कारवाई करणार आहात काय, असा सवाल त्यांनी केला. रवीशंकर प्रसाद हे देशाचे कायदा मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मग मोदी हेही गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनाही असेच म्हणाल का? उलट संजीव भट्ट यांना कारागृहात टाकले आहे, अशी माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!