चोंडी ग्राम सुरक्षा दलाच्या बैठकीत बाहेर जाण्या येण्यावर बंदी

किल्लेधारूर दि.१९(वार्ताहर) तालुक्यातील चोंडी येथे ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात आले असुन आज सकाळी समितीची बैठक होवून ज्याप्रमाणे बाहेरच्या व्यक्तींना क्वारांटाईन करण्यात येत आहे त्याप्रमाणे गावातील लोकांनीही इतर ठिकाणी जावू नये असा नियम करण्यात आला.
कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासनाने वाढता धोका लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागात सुरक्षा समित्या स्थापना करण्याचा निर्णय घेतला. चोंडी येथे ग्राम सुरक्षा समितीची स्थापना होवून बैठक घेण्यात आली. यावेळी जसे गावात प्रवेश केलेल्या लोकांना क्वारांटाईनचा नियम आहे त्या प्रमाणे गावातील व्यक्तीनी ही बाहेर जिल्ह्यात, तालुक्यात जाऊ नये असा निर्णय घेण्यात आला. ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांचे चेकपोस्ट वर चार तास चार सदस्य यांनी थांबून गावात येणाऱ्यांची विचारपूस करून त्यांना प्रवेश द्यावा असाही निर्णय घेण्यात आला. गावात येण्यासाठी दोन रस्ते आहेत त्या पैकी एक रस्ता बंद करून एकच रस्ता सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सरपंच बाबाराया मुंडे, ग्रामसेवक विजय गायसमुद्रे, ग्रा प कर्मचारी, अनगंवाडी कार्यकर्ती,आशा वर्कर, गावांतील तरुण व गावकरी हजर होते.