अन लोकांनी केला नगरसेवकाचा सत्कार….

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर) शहरातील आझाद नगर परिसरातील नागरी वस्तीत असलेली महावितरणची मुख्य विद्युत वाहिनीचे खांब अखेर स्थलांतर करुन हटविण्यात आले असुन वर्षानूवर्ष असलेली मागणी पुर्ण झाल्याने परिसरातील रहिवासी नागरिकांनी या भागाचे नगरसेवक शेख गफार यांचा सत्कार करत आभार व्यक्त केले.
वार्ड क्रमांक एक मधील आझाद नगर भागात ३० ते ४० वर्षा पासून महावितरणची मुख्य प्रवाह असलेली विद्युत वाहिनीचे खांब आहेत. सदरील विज वाहिनीमुळे यापुर्वी अनेक अपघात घडली आहेत. सदरील वीज वाहिनी जवळपास तेथील २५ ते ३० घरावरून जात होती. याभागातील रहिवाशांची अनेक दिवसांपासून सदरील वीज वाहिनी काढण्याची मागणी होती. महावितरणच्या या मेन लाईनची तारेचा प्रश्न खा. डाॅ. प्रितमताई मुंडे व धारूर शहराचे नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी यांच्या प्रयत्नातुन व महावितरण चे अधिकारी पेन्सिलवार व कनिष्ठ अभियंता निकम यांच्या सहकार्यातुन पुर्णत्वास आली असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक शेख गफार यांनी यावेळी दिली. सदरील प्रश्न मार्गी लागल्यामुळे या भागातील नागरीक गुलाब भाई मकानदार, शेख रज्जाक भाई, शेख हमीद, शेख रफीक, शेख शकील, समद तांबोळी, शेख अन्सर,शेख महेबुब, शेख बाबु, शेख अलाउद्दीन, शेख रईस, शेख खलील, सय्यद मोसीन, शेख राजु, सय्यद वसीम, शेख अतीक, शेख मजहर, शेख तोफिक, आदीनी नगरसेवक शेख गफार यांचा सत्कार केला.