दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच मुख्यमंत्री ठाकरे यांचे सुशांत आत्महत्या प्रकरणी भाष्य

मुंबईः– मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे Udhav Thakre यांनी प्रथमच सुशांत आत्महत्या प्रकरणात भाष्य करत यात सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत आदित्य ठाकरेंची पाठराखण केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांना हात घालत भाजपावर टिका केली.

दि.२५ ऑक्टोबर रविवारी मुंबईत सावरकर सभागृहात शिवसेनाचा दसरा मेळावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Udhav Thakre यांनी विविध विषयांना हात घालत विरोधकांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण हे सरकार पाडण्याच्या मागे आहेत मी इथून आव्हान देतो की, हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असे थेट आवाहन त्यांनी केले. आजच्या दसरा मेळाव्याबाबत बोलताना शिवसेनेचा दसरा मेळावा हा सभागृहात होत नाही आपल्याला सभेसाठी शिवाजी पार्क मैदान सुद्धा कमी पडते असे सांगत आम्ही गुळाला चिकटणारे मुंगळे नाही, मुंगळा कसा डसतो ते आम्ही दाखवून देवू असे सांगितले. ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणात हिंदुत्व, सुशांत आत्महत्या, राज्यपाल, जिएसटी, दानवे, मुंबई, गोवंश, बाबरी, कोरोना, मंदिर उघडने, कारशेड, कश्मीर आदी विषय हाताळण्यात आली. शेवटी ओबीसी समाज, मराठा समाज, धनगर समाज, या सर्वांना न्याय देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणून ग्वाही दिली. यावेळी खासदार संजय राऊत यांनीही अभूतपूर्व परिस्थितीत हा दसरा मेळावा साजरा होत असल्याचे सांगत आम्ही रडीचा डाव खेळत नसल्याचे प्रतिपादन केले.

CM Udhav Thakre

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!