कारवाईच्या आश्वासना नंतर उपोषण मागे

किल्लेधारूर दि.१४ (वार्ताहर) धारूर तालूक्यात पिक कर्ज देताना शेतकऱ्यांची प्रचंड अडवणूक केली जात होती व शेतकऱ्यांना अपमानस्पद वागणूक दिली जात होती यामुळे एस बी आय पेठ शाखेचे फिल्ड आॕफीसर वर कारवाई करण्याचे मागणी साठी अमरण उपोषण मंगळवारी तहसील कार्यालया समोर सुरू करण्यात आले होते. या बाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासना नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी ग्राहकानी कडक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. धारूर येथील एस बी आय पेठ विभाग शाखेतील फिल्ड आॕफीसर चे मनमानी कारभार शेतकऱ्यांशी करत असलेले गैरवर्तन खातेदाराना अपमानास्पंद वागणूक व अडवणूक यामुळे पिक कर्जा साठी आलेले शेतकरी व तरूण व्यवसायीक कदरून गेले होते. या फिल्ड आॕफीसर ची चौकशी करून त्यांचे वर कडक कारवाई करावी या मागणी साठी शेतकरी व तरूण व्यवसायीक यांनी तहसील कार्यालया समोर आज मंगळवारी दि.१४ जुलै पासून आमरण उपोषण सुरू केले होते. नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी या बँकेचे शाखा व्यवस्थापक विनोदकूमार यांना तहसील कार्यालयात बोलवून उपोषणकर्ते राष्ट्रवादी काॕग्रेस गटनेते सुधिर शिनगारे, शहराध्यक्ष नितिन शिनगारे, शिवसेनेचे तालूकाप्रमूख नारायण कुरूंद, पञकर राजू मोरे यांचे समवेत चर्चा केली. यावेळी उपोषणकर्त्याचे प्रतीनीधी यांचे सोबत चर्चा केली व संबंधीत फिल्ड आॕफीसर चे कारभाराची चौकशी करून कारवाई अहवाल प्रस्तावीत करण्याचे लेखी अश्वासन दिले. बँकेतील सर्व पिक कर्ज ची प्रकरणे निकाली काढणे बाबत सुचना देऊन लेखी आश्वासन दिल्या नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणकर्त्या मध्ये राजू गायकवाड, अमरजीत शिनगारे, भागवत लांडगे, बबलू सावंत, शरद उबाळे, नितीन शिरसाट, हनुमंत तिडके, बाबा तिबोले, भाऊसाहेब ओताडे आदीचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!