सोशल डिस्टंटींगचा वापर करुन आमरण उपोषणाचा इशारा
गणेश सावंत यांचा इशारा

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर) शहरातील मठ गल्लीत डेगूंसदृश्य तापीचे रुग्ण आढळत असुन याभागातील नागरी सुविधा बाबत यापुर्वीही निवेदन देवून दखल घेतली नसल्याने यानंतर नगर परिषदेसमोर सोशल डिस्टंटींग चा वापर करत आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गणेश सावंत यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कसबा विभागात मठ गल्लीत तापसदृश्य लक्षणे असणारी रुग्ण संख्या समोर येत आहे. याभागात डेंगूची साथ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश सावंत यांनी याभागातील नागरी समस्यांवर नगर परिषदेचे लक्ष वेधत पुर्वी दिलेल्या निवेदनाचे स्मरण करुन दिले आहे. याभागातील नालीचे पाणी रस्त्यावर येणे, हातपंप चोकअप होवुन पाणी, साचने, पथदिवे बंद असणे आदी समस्या निदर्शनास आणून देण्यात आली आहेत. या समस्या बाबतीत नगर परिषद प्रशासनाने विशेष कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करत दखल न घेतल्यास सोशल डिस्टंटींग वापरत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.