ज्ञानप्रबोधनीच्या वतीने 50 गरजू कुंटूंबाना जिवनावश्यक वस्तूचे वाटप
घटनाकारडॉ.आंबेडकर जयंती अभिनव उपक्रमातून साजरी

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) धारूर शहरात ज्ञानप्रबोधनी च्या वतीने शहरातील गरजू होतकरू मजूर 50 कुंटूंबाना जिवनवाश्यक वस्तूचे किट देऊन आगळ्या वेगळ्या पध्दतीने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभिनव अशा उपक्रमातून साजरी करण्यात आली.
सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव रोकण्या साठी प्रशासन कठोर उपाययोजना करत असून गेल्या एकवीस दिवस पासून लाॕकडाऊन सुरू आहे. पुढे 3 मे पर्यंत लाॕकडाऊन कालावधी वाढविण्यात आला आहे. रोज मजूरी करून आपल्या कुंटूंबाचा उदरनिर्वाह भागवणारे माञ या काळात काम बंद असल्याने अडचणीत आले आहेत. अशा धारूर शहरात ज्ञानप्रबोधनी कडून 50 गरजू कुंटूंबाना जिवनवाश्यक वस्तूचे किट देऊन त्यांना आधार देण्यात आला. शहरात यापुर्वीही कोरोना लाॕकडाऊन मध्ये शिकलकरी समाजाचे 21 कुंटूंबाना ज्ञानप्रबोधीनीकडून मदत करण्यात आली होती. लाॕकडाऊन चे विस दिवस झाल्यावर मजूर कुंटूंब माञ चांगलीच अडचणी आले आहेत. घटनकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचीत्य साधून ज्ञानप्रबोधनी च्या वतीने शहरातील अशा 50 कुंटूंबाना जिवनवाश्यक वस्तूचे किट देण्यात आली. शहरातील सर्व भागातील मजूर व खरी गरज असलेल्या कुंटूंबाना हि मदत करण्यात आली.