“गोविंदा” ने परळीकरांचे मन जिंकले….
धनंजय मुंडे जैसे नेता असली जिंदगी के हिरो- गोविंदा

परळी:दि.१३- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेते गोविंदा (Govinda) यांनी हिंदी चित्रपट सृष्टी बॉलिवूड (Bollywood) उभी करण्यात महाराष्ट्राचे सर्वात मोठे योगदान असून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जैसे नेता असली जिंदगी के हिरो असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी परळीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटासह गोविंदाचे स्वागत केले.
परळीत (Parli) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही आगळा वेगळा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते परळीत सपत्नीक आलेले प्रसिद्ध सिने अभिनेते गोविंदा (Govinda). सिने अभिनेते गोविंदा व मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ८१ किलो वजनाचा केक कापून शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात परळीतील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, ५००० महिलांना साडी वाटप करण्यात आले. तब्बल एकेवीस वर्षानंतर अभिनेते गोविंदा सपत्नीक परळीत आले. १९९९ साली गोविंदा यांनी परळीत (Parli) आले तेव्हा धनंजय मुंडे हा माणूस मोठा होईल असे उद्गार काढले होते. त्याची आठवण करुन देत धनंजय मुंडे यांच्या कार्याचे कौतुक केले. खा. पवार साहेबांबद्दल बोलताना गोविंदा यांनी बॉलीवूड (Bollywood) ही महाराष्ट्राची व मुंबईची देन असून याला उभं करण्यात पवार साहेबांसारख्या नेतृत्वाचा मोठा हातभार असल्याचे सांगितले. यावेळी ना. मुंडे यांच्यासह आ. संजय दौंड, जि. प.अध्यक्षा सौ. शिवकन्या सिरसाट, मा.आ. पृथ्वीराज साठे गोविंद देशमुख, वाल्मिक अण्णा कराड, सोमनाथ आप्पा हालगे, बाजीराव धर्माधिकारी, अजय मुंडे, लक्ष्मणराव पौळ, डॉ. मधुकर आघाव, दीपक देशमुख, ऍड. गोविंदराव फड, शकील कुरेशी, शरद मुंडे, अजीज कच्छी, माऊली गडदे, भाऊसाहेब कराड, माणिक फड, चेतन सौंदळे, सूर्यभान मुंडे, राजेश्वर देशमुख, दत्ता पाटील, राजपाल लोमटे, विलास सोनवणे, रणजित लोमटे, पिंटू मुंडे, शिवाजी सिरसाट, चंदूलाल बियाणी, रामेश्वर मुंडे, अभय मुंडे, प.स. सभापती सौ. उर्मिलाताई गित्ते, संगीता तुपसागर, अर्चना रोडे, पल्लवी भोईटे, यांसह मोठ्या संख्येने परळीकर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ.विनोद जगतकर यांनी तर आभार नितीन कुलकर्णी यांनी मानले.