धारुरला धक्का…. कोरोनाचा पहिला बळी

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर) शहरातील कोरोनाग्रस्त व्यक्तीचे अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना निधन झाल्याचे वृत्त येत असून जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना बळीत धारुरचाही समावेश झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५ झाली आहे. शहरात वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब असुन प्रशासनाचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणे हाच पर्याय आहे. वाढती रुग्ण संख्या व आज सकाळी अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना धारुरच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आल्यामुळे शहर दहशतीखाली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!