शंभर पेक्षा जास्त कुंटूंबानी केला पर्यावरण शुध्दी यज्ञ

आर्य समाजाचा उपक्रम

किल्लेधारूर दि.३(वार्ताहर) आर्य समाजच्या वतीने कोरोनाचा प्रादूर्भाव रोकण्यासाठी घराघरात पर्यावरण शुध्दी यज्ञ करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद म्हणून शहरात शंभर पेक्षा जास्त कुटूंबानी हवन केले.

सध्या कोरोना चा प्रादूर्भाव रोकण्यासाठी सर्वञ प्रशासन कठोर उपाययोजन करत आहे. या पार्श्वभूमी वर आर्य समाजाच्या वतीने देशभरात पर्यावरण शुध्दी यज्ञ प्रत्येक कुटूंबाने करावा असे आवाहन करण्यात आले होते. धारूर शहरातही आर्यसमाजच्या वतीने जनतेस आवाहन करण्यात आले होते. शहरात शंभर पेक्षा जास्त कुटूंबानी या आवाहनास प्रतीसाद देऊन हे पर्यावरण शुध्दी यज्ञ घराघरात केले. आर्यसमाजचे प्रधान प्रमोदकूमार तिवारी, सोमनाथआप्पा आर्य, अॕड. सुधिर मिश्र, कमलाकर इंदूरकर, काशीनाथ चिंचाळकर, जिंतेद्र महामूनी, चंद्रकांत देशपांडे, उध्दव खाडे, प्रविण जवकर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!