घात-अपघात

बीडच्या टेकवाणी कुटूंबावर काळाचा घाला; कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू.

आष्टी दि.12 मे – आष्टी तालुक्यातील म्हसोबा वाडी जवळ धामणगाव घाटात असलेल्या वळणावर कारचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळली. या भीषण अपघातात बीडच्या प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. सदर अपघात बुधवारी (दि.11) संध्याकाळी घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडचे व्यापारी कुटूंबातील चौघे आपल्या क्रेटा या कारने (MH 23 AS 4025 ) पुण्याहून बीडच्या दिशेने येत होते. या गाडीचा आष्टी तालुक्यातील धामणगाव घाटात भिषण अपघात झाला. या अपघातात बीड मधील दिव्या गार्डन वाइन शॉपचे मालक टेकवाणी कुटूंबातील चौघे जण ठार झाले आहेत.

क्रेटा या कारने संपूर्ण सहकुंटुबासोबत टेकवाणी प्रवास करत असताना गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी चालकाला वेग आवरला नाही. गाडी भरवेगात म्हसोबाची वाडी जवळील वळणाच्या खाली गेली. त्यात दुर्दैव असे की एकाच कुटुंबातील जवळपास पाच व्यक्ती त्या गाडीत होते. त्यातील चार जण जागीच ठार झाले तय हे एक गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह लखन टेकवाणी यांचा जागीच मृत्यू झाला. टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच बीड येथील टेकवाणी यांच्या निवासस्थानी नातेवाईक व मित्रमंडळींनी गर्दी केली होती.

( Beed’s Tekwani family is blackened; Four killed in car accident. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!