राज्यात उद्यापासून पुन्हा कर्फ्यू… मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबईः– जगातील सहा राष्ट्रात कोरोनाचे (corona) नवीन रुप समोर आले असून या ब्रिटेनमध्ये कहर सुरु होताच या धर्तीवर भारतात विशेष काळजी घेतली जात आहे. सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबर पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उद्यापासून ५ जानेवारी पर्यंत राज्यातील सर्व २७ महापालिका क्षेत्रात रात्रीचा नाईट कर्फ्यू (Curfew) (रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत) लागू करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने ब्रिटेन विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. उद्यापर्यंत ब्रिटेनहून दोन प्रवासी विमान येणार आहेत. या प्रवाशांची संपूर्ण तपासणी करण्यात येणार असून प्रवाशांना १५ दिवस कोरोंटाईन रहावे लागणार आहे. लक्षणे आढळून येणाऱ्या प्रवाशांची रवानगी सेव्हन हिल रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी माध्यमांना दिली. सदरील निर्णय हा खबरदारी म्हणून घेतल्याची माहिती गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांनी दिली.
लागू करण्याचा निर्णय घेतला. उद्यापर्यंत ब्रिटेनहून दोन प्रवासी विमान येणार आहेत. या प्रवाशांची संपूर्ण तपासणी करण्यात येणार असून प्रवाशांना १५ दिवस कोरोंटाईन रहावे लागणार आहे. लक्षणे आढळून येणाऱ्या प्रवाशांची रवानगी सेव्हन हिल रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी माध्यमांना दिली.