धारुर तालुक्यात 32 वर्षीय युवा व्यवसायिकाचे निधन; कोरोना मृत्यूचे थैमान अन आकडेवारीचा घोळ ….

किल्लेधारूर दि.13 मे – तालुक्यात मृत्यूचे सत्र सुरुच असून दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढतच आहे. तालुक्यातील देवठाणा येथील एका 32 वर्षीय युवा व्यवसायिकाचे दोन दिवसांपुर्वी कोरोनाने निधन (Corona Death) झाले. त्याच्या निधनाने देवठाणा, दिंद्रुड गावात हळहळ व्यक्त होत आहे.
(32-year-old businessman dies in Dharur taluka; Corona’s death is a mess of statistics ….)
मृत्यूंच्या आकड्याचा घोळ …
सध्या कोरोना मृतांचा आकडा लपवला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारीत तथ्य असल्याचे आकडेवारी वरुन दिसुन येते. बीडमधील स्मशानात 378 कोरोना बाधित (Corona Positive) मृतांवर अंत्यसंस्कार केले होते, तर आरोग्य विभागाकडे 273 मृत्यूंची नोंद होती. यात 105 कोरोना बळींची तफावत होती. हा प्रकार माध्यमांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली.
दोन दिवसांत तब्बल 85 जुन्या मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास 70 पेक्षा जास्त कोरोना बाधितांचे (Corona Positive) मृत्यू हे एकट्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील आहेत.
धारुर (Dharur) तालुक्यात गेल्या आठवड्यात कोरोना मृत्यूची (Corona Death) नोंद 35 होती ती काल 51 झाली. तब्बल 16 मृत्यूची वाढ झालेली दिसुन आली. याउपरही आणखी काही मृत्यू नोंदवली नसल्याचे दिसुन येते. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस कोरोना बळींची संख्या वाढत असून बळीमध्ये युवकांचाही समावेश आहे.
युवा व्यवसायिकाचा कोरोनामुळे मृत्यू …
तालुक्यातील देवठाणा येथील 32 वर्षीय विलास बाबासाहेब सोळंके यांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला. देवठाणा येथील व्यावसायिक, विलास सोळंके यांचे दिंद्रुड येथे फँब्रीकेशनचे दुकान आहे. लाँकडाऊन काळामध्ये सकाळी 7 ते 11 या वेळेत दुकान उघडण्याची मुभा असताना, दुकानी गेले असता त्यांना कोरोनाची लागण झाली. सुरवातीला धारुर येथील कोविड केअर सेंटरवर उपचार घेतले, नंतर माजलगाव येथील राजे भोसले यांच्या दवाखान्यात उपचार घेऊन ते घरी आले.
मात्र मंगळवारी दुपारी 1 च्या दरम्यान त्यांचा बीपी हाय झाल्याने हृदयविकाराचा धक्का बसला, त्यानंतर त्यांना अबांजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र त्यांनी काही वेळातच प्राण सोडला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. त्यांच्या मृत्युने संपुर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे, या घटनेनंतर संपूर्ण गाव व परिसर हळहळ व्यक्त होत आहे.