आरोग्य

धक्कादायक … राज्यात उन्हामुळे आठ जणांचा मृत्यू; 92 जणांना उष्माघात.

मुंबई दि.12 एप्रिल – राज्यात उष्माघातामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून 92 जणांना उष्माघाताचा (Heat stroke) त्रास झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात तीन, नागपूरमध्ये (Nagpur) दोन आणि अकोला, अमरावती व उस्मानाबाद (Osmanabad) येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे. अलिकडच्या चार वर्षात ही संख्या वाढली आहे.

महाराष्ट्रात उष्णतेची लाटांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात (Marathwada) याचा परिणाम अधिक प्रमाणात दिसून येत आहे. या भागात दिवसाचे कमाल तापमान गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सरासरीपेक्षा अधिक आणि 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात तापमानचा पारा 40 ते 41 अंश सेल्सिअसवर गेला आहे. यामुळे तीव्र उन्हाळ्याच्या झळा (heat wave) थेट सर्वसामान्यांना बसत असल्याचे दिसत असून उष्माघाताचे रुग्ण वाढले आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नूसार नागपूर विभागात 62 तर अकोला विभागात 15 जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. नाशिकमध्ये नऊ जणांना तर लातूरमध्ये (Latur) एका व्यक्तीला उष्माघातामुळे त्रास होत असल्याने उपचार करावे लागले आहेत. पुणे विभागात पाच जण उष्माघातामुळे आजारी पडले आहेत. राज्यात आजवर आठ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

रुग्णांचा मृत्यू उष्माघातानेच झाला आहे का, याची पडताळणी करण्यासाठी जिल्हानिहाय समिती असते. या समितीने मंजूर केल्यानंतरच ही नोंद केली जाते. गेल्या काही दिवसांत उष्णतेच्या लाटा वाढल्यामुळे यावर्षी एप्रिलमध्येच उन्हाची तीव्रता जास्त वाढली आहे. परिणामी मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येवरही याचा परिणाम झाला आहे, असे राज्याचे साथसर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

( Shocking … Eight killed in heat wave in the state; Heat stroke in 92 people. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!