पालीच्या शाळेतून एचआयव्ही बाधित मुलांना हाकलले…. इन्फंट इंडिया संस्था आक्रमक

बीड: दि.४(प्रतिनिधी)  बीड (Beed) तालुक्याच्या पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेतून एचआयव्ही (HIV) बाधित पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार बुधवारी घडला. याप्रकरणी पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली असून याची चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास सत्याग्रह, बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही इन्फंट इंडिया (Infont India) संस्थेनं दिला आहे. दरम्यान मुलांना हाकललं नसल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक कांतीलाल लाड यांनी दिली.

एचआयव्ही बाधितांना समाजात सन्मान देऊन मानसिक आधार देण्याचा प्रयत्न शासन स्तरासह काही सामाजिक संस्थाकडून केला जातो. मात्र, काही ठिकाणी आजही त्यांना तुच्छ वागणूक दिली जात असल्याचे दिसुन येते. बीड (Beed) तालुक्यातील पाली येथील जिल्हा परिषद शाळेतून पाच विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत इन्फंट इंडिया (Infont India) या एचआयव्ही (HIV) बाधित मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेतील हे विद्यार्थी आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सदरील प्रकाराची तक्रार करत याची चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास सत्याग्रह, बेमुदत उपोषण करण्याचा इशारा इन्फंट इंडिया संस्थेनं दिला आहे. याबाबतीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी मात्र असा प्रकार घडला नसल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!