चिंताजनक… गुरुवारी महाराष्ट्र हादरला; आजपर्यंतची सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह संख्या;

मुंबई दि.19 मार्च – आज गुरुवारी महाराष्ट्राची (Maharashtra) कोरोना बाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक 24 हजार 896 रुग्ण एका दिवसात आढळले होते. तो रेकॉर्ड मोडत आज 25 हजार 833 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 58 रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
(Worrying … Maharashtra trembled on Thursday; The highest number of corona positives to date;)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग (Corona virus) होण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना संसर्गाचा (Corona virus) दिवसेंदिवस वाढणारा वेग आणि लोकांनी केलेले दुर्लक्ष यामुळे राज्याला गंभीर परिणामाचा सामना करावा लागत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोना बाधित (Corona Positive) आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे. ही परिस्थिती पाहता आता राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. आज गुरुवारी दिवसभरात राज्यात 25 हजार 833 नवीन करोना बाधित (Corona Positive) वाढले असून, 58 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
गुरुवारी राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये सर्वाधिक 24 हजार 896 रुग्ण एक दिवसात आढळले होते. आज 25 हजार 833 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक शहरांसह जिल्ह्यामध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मात्र, तरीही दैनंदिन बाधितांची संख्या आपले जुने विक्रम मोडीत काढत आहे. गुरुवारी राज्यात 23 हजारापेक्षा जास्त नव्या रुग्णांची भर पडली होती.
मृत्यूदरात महाराष्ट्र देशात दुसरा
देशात कोरोना बाधितांच्या मृत्यूदरात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी आहे. 17 मार्चपर्यंत राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यूदर 2.26 आहे. तर, देशभरातील मृत्यूदराचा आकडा 1.39 टक्के आहे. याशिवाय महाराष्ट्रापेक्षा जास्त मृत्यू दर पंजाबमध्ये आहे, तर सर्वात कमी मृत्यूदर महाराष्ट्राला लागून असलेल्या दादरा नगरहवेलीमध्ये 0.06 टक्के आहे.
15 हजार रुग्णांपैकी 400 गंभीर – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यातील 15 हजार कोरोना बाधित रुग्णांपैकी गंभीर रुग्णांचे प्रमाण 400 एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. राज्यात पुन्हा लॉकडाऊन न लावता कडक निर्बंध लावले जातील, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही चिंतेची बाब असून कोविड नियंत्रण उपाययोजना सुरू आहेत. राज्यात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहेत. राज्य सरकार लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार आहे, अशी माहिती राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
गर्दी नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय योजनावर चर्चा सुरू आहे, कोविड संदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेस करणे हे राज्य सरकार पुढे आव्हान आहे. कुठेही बेड कमी नाहीत. खाजगी ठिकाणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये अडचण असेल. राज्यात 85 टक्के असिमटोमॅटिक रुग्ण आहेत. रोज 3 लाख लसीकरणाचे लक्ष आहे. लसीकरणासाठी 100 बेडच्या रुग्णालयाची अट शिथिल करून 50 किंवा 25 करावी अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे, असेही टोपे यांनी सांगितले.