दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली; यातारखेला लागणार निकाल.

मुंबई दि.7 जुलै – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द झाली होती. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्क्स कसे मिळणार याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. त्यानंतर आता दहावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. (SSC Results) मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल 15 जुलै 2021 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. या दिवशीच दहावीचा निकाल महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर होण्याची शक्यता आहे.
(The wait for tenth graders is over; The result of the tenth will be on this date.)
महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी आणि 12 वीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता सांगीतली होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी 28 मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत निकष जाहीर केले. त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शाळांना शासनानं ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल (SSC results) जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये जाहीर होणार आहे.
शाळांकडून दहावीच्या निकालसंदर्भातील शासन निर्णयानुसार गुण नोंदवण्यात येत असल्याची माहिती आहे. शासन निर्णयाचे पालन करण्याचे आदेश दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याच सूत्र निश्चित करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं शासन निर्णयाच्या अधीन राहून दहावीचा निकाल वस्तूनिष्ठचं असायला हवा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत. प्रक्रियेचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दहावीचा निकाल कसा लावणार?
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी आणि 10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 नुसार मूल्यमापन (Evaluation) तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल जुलै महिन्यात जाहीर होईल, असं म्हटलं होतं.
I. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन (Evaluation) 30 गुण देण्यात येतील.
II. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
III. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.