महानायक ‘ट्रॅजिडी किंग’ हरवला; सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन.

मुंबई दि.7 जुलै – बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांचे आज बुधवारी (7 जुलै) सकाळी साडेसात वाजता वयाच्या 98 व्या वर्षी प्रदिर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग (Tragedy King) म्हणून दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार (Tragedy King) यांचं मोठं नांव होतं. दिलिपकुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतीय चित्रपट सृष्टीचं न भरुन येणारं नुकसान झाल्यांच ट्विट करत शोक व्यक्त केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देश महानायकाला मुकला असल्याची प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला.

(‘Tragedy King’ lost; Evergreen actor Dilip Kumar passes away.)

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना हिंदूजा रुग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला.

मागील अनक वर्षांपासून दिलीप कुमार यांची तब्येत खालावलेली होती. त्यांच्यावर सातत्याने उपचार करण्यात येत होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे. अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते, तिथेच त्यांनी आज सकाळी साडेसात वाजता अखेरचा श्वास घेतला.

दिलीप कुमार यांची कारकीर्द
बॉलिवूडला (Bollywood) दिलीप कुमार यांनी एकापेक्षा एक असे चित्रपट दिले. त्यांनी सन 1944 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला दुर्लक्षित करण्यात आले होते. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘प्रतिमा’ (1945) आणि ‘नौकाडूबी’ (1947) हे चित्रपट सपशेल फ्लॉप ठरले होते. मोगल- ए- आजम चित्रपटापासून दिलिप कुमार यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

यानंतर त्यांनी ‘जुगनू’ (1947) या चित्रपटात काम केले. हा चित्रपट हिट झाला होता. यानंतर ‘शहीद’ (1948) चित्रपटही यशस्वी ठरला. यासोबतच ते स्टार म्हणून नावारुपाला आले. कारकिर्दीत त्यांनी एकूण 62 चित्रपटात काम केले. त्यातील 5 चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. त्यांनी एकूण 57 चित्रपटात मुख्य अभिनेता (Hero) म्हणून काम केले. त्यात 1947 ते 1996 दरम्यान 25 चित्रपट फ्लॉप झाले. त्यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलेल्या 2 चित्रपटांचा समावेश होता.

त्यांनी 1947 ते 1974 दरम्यान 30 सुपर हिट (Super Hit) चित्रपटात काम केले. यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलेल्या 3 चित्रपटांचा समावेश होता. याव्यतिरिक्त त्यांचे मुख्य अभिनेता (Hero) म्हणून 23 चित्रपट फ्लॉप आणि 34 चित्रपट सुपर हिट (Super Hit) ठरले. त्यांनी केलेल्या एकूण 62 चित्रपटांमध्ये 25 फ्लॉप आणि 37 सुपर हिट ठरले.

आज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार त्यांनी आपला आदर्श मानतात. अनेक कलाकारांनी तर त्यांची नक्कल करुन बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. इतका लोकप्रिय असलेला हा अभिनेत्याने वयाच्या 98 व्या वर्षापर्यंत आजाराशी लढा दिला. वयोमानामुळं गेल्या काही काळात अनेकदा त्यांची तब्येत बिघडली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!