शैक्षणिक

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी… या तारखेपासून राज्यातील सर्व शाळांची घंटा वाजणार.

मुंबई दि.7 अॉगस्ट – काल उच्च व तंत्रशिक्षाण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालय सुरु करण्याचे संकेत दिले असताना शुक्रवारी येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांचा आदेश आल्यावर याची अंमलबजावणी होईल. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक आहे. त्यात यावर चर्चा होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली.

(Good news for the students … from this date all the schools in the state will ring their bells.)

सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ब्रेक द चेन (Break The chain) अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत (Guidelines) शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आले आहेत.

मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.

सीएसआर (CSR) फंडातून राज्य सरकार 471 शासकीय शाळांचं करणार परिवर्तन
सीएसआर फंडातून राज्य सरकार 471 शासकीय शाळांचं परिवर्तन करण्यात येणार आहे. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि 40 नामांकित कंपन्यांचे उद्योजक उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात सीएसआर फंडातून 471 शाळांच परिवर्तन आहे. या शाळांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, इमारत आणि इतर सुविधा उपलब्ध असणार आहेत.

कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा विचार – उदय सामंत
येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस (colleges) प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंत (Uday Samant) यांनी काल सांगितलं. कुलगुरूंची बैठक पार पडली. नवीन शैक्षणिक वर्ष (academic year) सुरू झालं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे. संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. त्यामुळे 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंय यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!