आनंद वार्ता…. पाऊस परतणार; हवामान खात्याचा अंदाज, पहा काय आहे राज्याची स्थिती.

मुंबई दि.10 अॉगस्ट – जुलै महिन्यात राज्यात काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा (Marathwada) आणि खानदेशात पावसाच्या उघडीपीने चिंता अधिक वाढली आहे. राज्यात चालू आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी राहणार असून पुढील आठवड्यात पावसाला पुन्हा सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
(Good news …. rain will return; Weather department forecast, see what is the state of the state.)
12 ऑगस्टपर्यंत पावसाची दडी कायम
जुलै मध्ये गेले वीस दिवस कोकण आणि घाट माथ्यावर थैमान घातल्यानंतर पावसाचा जोर कमी होत उघडीप दिली आहे. कोकण नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या धो-धो पावसाने (heavy rain) रत्नागिरी, रायगड सह कोल्हापूर, सातारा, सांगली, जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती सध्या ओसरली आहे. तर दुसरीकडं उत्तर मध्य महाराष्ट्रात यंदा अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार चालू 6 ते 12 ऑगस्ट या कालावधीत राज्यात पावसाची दडी कायम राहणार आहे.
13 तारखेपासून पावसाला पुन्हा सुरुवात
येत्या 13 ते 19 ऑगस्ट या कालावधीत राज्याच्या बहुतांश भागात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहणार आहे. तर उर्वरित राज्यात आठवड्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकणात जोरदार पाऊस पडणार असून दक्षिण मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने (Meteorological Department) स्पष्ट केले आहे.
11 जिल्ह्यांना येलो अलर्ट
आज मुंबई, पुण्यासह विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आज नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला अशा एकूण 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.
राज्यातील 3 चतुर्थांश पीकक्षेत्र आघातप्रवण
राज्यातील जवळपास 3 चतुर्थांश पीकक्षेत्र हे वातावरणीय पालटामुळे आघातप्रवण (Traumatic) झाले आहे, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम हे 10 जिल्हे अधिक प्रमाणात आघातप्रवण, वातावरण पालटास अधिक संवेदनशील आहेत’, असे अभ्यासक चैतन्य आढाव यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया अन् गडचिरोली हे इतर 14 जिल्हेही मध्यम स्वरूपात आघातप्रवण झाले आहेत. मुख्यत्वे करून या जिल्ह्यांतील ज्वारी, तांदूळ, गहू, ऊस, कापूस, नाचणी, काजू, बार्ली आणि बाजरी या पिकांना वातावरणातील संकटांचा सर्वाधिक फटका सहन करावा लागू शकतो, असेही अभ्यासातून पुढे आले आहे.