बीडसह या जिल्ह्यांना अलर्ट… पहा पुढील चार दिवस कुठं आणि कसा असेल पाऊस.

पुणे दि.16 अॉगस्ट – राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर (Heavy Rain) पुन्हा सुरु झाला आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस होत आहे. भारतीय हवामान खात्याने (Meteorological Department) दि. 19 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज जारी केला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. तर, 19 ऑगस्टला कोणताही अलर्ट नसणार आहे.
(Alert to these districts including Beed … see where and how the rain will be for the next four days.)
16 ऑगस्टची पावसाची स्थिती कशी?
सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड (Beed), लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो (Yellow Alert) अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याच्या (Weather department) वतीनं वर्तवण्यात आला आहे.
17 ऑगस्टला राज्याच्या या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट
हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या अनेक भागात पाऊस (rain fall) होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करणात आला आहे.
18 ऑगस्टला कोकण ते विदर्भ पट्यात पाऊस पडण्याची शक्यता
सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.