बीडसह मराठवाड्यावर पुन्हा अतिवृष्टीचे सावट; पुढील चार दिवस हाय अलर्ट

पुणे दि.20 सप्टेंबर – राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावण निर्माण होत असल्याने 20 सप्टेंबरपासून तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी (rain fall) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा (Heavy rains) अंदाज आहे.
(Heavy rains hit Beed and Marathwada again; High alert for the next five days.)
मागील पंधरवडामध्ये मराठवाड्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. जवळजवळ 31 ठिकाणी ढगफुटीचा सामना करावा लागला. कमी दाबाचे पट्टे विरल्यानंतर गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. दोन ते तीन दिवसांत उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जाणारे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. परिणामी महाराष्ट्रातही पावसाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे.
हवामान विभागाच्या (Meteorological Department) अंदाजानुसार, कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात 20 सप्टेंबरपासून, तर मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांत 21, 22 सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार पावसाचा (heavy rain) अंदाज आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत 20 सप्टेंबरपासून तीन ते चार दिवस विजांच्या कडकडाटासह काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पुणे जिल्ह्यात व मराठवाड्यातील बीडसह (Beed) औरंगाबाद, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत काही भागांत 20, 21 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे.